इमेज
सामाजिक कार्यकर्ते संतोष  शिंदे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी; सकल मराठा समाजाचे निवेदन परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भैय्या (जीवनराव) शिंदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संतोष शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा वस्तुस्थितीला धरून नसून संबंधित फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सदर घटना ही किरकोळ मतभेदातून घडलेली असून, चोरी करणे किंवा गंभीर स्वरूपाची इजा पोहोचविणे असा कोणताही हेतू संतोष शिंदे यांचा नव्हता, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे म्हटले आहे की, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या संतोष भैय्या शिंदे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून परळी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या...

समन्वयातून प्रश्न सोडवा: भाविकांना दिलासा द्या

वैजनाथ देवल कमिटी व पुरोहित संघाने आपसात सुसंवाद साधून भाविकांची गैरसोय दूर करावी -अभयकुमार ठक्कर



पुरोहितांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यास परवानगी द्यावी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित संघासाठी अभिषेक संदर्भात घालून दिलेल्या अटी जाचक आहेत या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी पुरोहित संघाने सुरू केलेले आंदोलन योग्य आहे तरी भाविकांची सोय लक्षात घेता देवल कमिटी व पुरोहितांनी आपसामध्ये योग्य समन्वय साधावा व समस्त भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे 


वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित वर्गासाठी घालून दिलेले नियम जाचक असून पुरोहित संघाची अभिषेक सुरू ठेवण्याची पूर्वपार व परंपरागत पद्धत सुरू ठेवावी ही मागणी योग्य असून वैजनाथ मंदिर विश्वस्त समिती व त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पुरोहित संघाने भाविकांची सोय लक्षात घेऊन आपसात योग्य समन्वय साधावा अशी मागणी समस्त भाविक वर्ग, परळीकर व आम जनतेतून होत आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग असल्याने प्रभू वैजनाथ मंदिरातील महत्त्व व पावित्र्य भाविक वर्गामध्ये खूप मोठे आहे बीड जिल्हा नव्हे तर राज्य व परराज्यातूनही मोठा भाविक वर्ग या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो बाहेरून येणाऱ्या तसेच स्थानिक भाविक वर्गाची अभिषेक करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे परंतु मागील काही दिवसा पूर्वी वैद्यनाथ देवल कमिटी विश्वस्थांनी पुरोहित संघांना जाचक अटी घालून दिले आहेत. यामुळे पुरोहित वर्ग संतप्त असून पूर्वीप्रमाणेच अभिषेक चालू ठेवावेत व पुरोहित संघाला दिलासा द्यावा अशी मागणीचे निवेदन पुरोहित संघाने तहसीलदार यांच्यामार्फत संबंधितांना दिली आहे. हे सर्व चालू असताना सकाळचे अभिषेक बंद असल्यामुळे भाविक वर्गातही मोठा असंतोष व नाराजीचा सूर उमटला आहे .


*पावसाचे प्रमाण वाढावे म्हणून वैद्यनाथ प्रभूस पाणी अर्पण करण्यात यावे*


पावसाचे अत्यल्प प्रमाण पाहता समस्त भाविकांचे प्रभुवैद्यनाथाला कावडीद्वारे व कळसाद्वारे अभिषेक करण्याची परंपरा आहे यामुळे पृथ्वीवर पावसाचे प्रमाण योग्य राहील अशी भाविकांची धारणा व श्रद्धा असते त्यामुळे पुरोहितांद्वारे अभिषेक व पाणी घालण्याची परंपरा चालू ठेवावी अशी ही मागणी श्री अभय कुमार ठक्कर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या