दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

समन्वयातून प्रश्न सोडवा: भाविकांना दिलासा द्या

वैजनाथ देवल कमिटी व पुरोहित संघाने आपसात सुसंवाद साधून भाविकांची गैरसोय दूर करावी -अभयकुमार ठक्कर



पुरोहितांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यास परवानगी द्यावी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित संघासाठी अभिषेक संदर्भात घालून दिलेल्या अटी जाचक आहेत या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी पुरोहित संघाने सुरू केलेले आंदोलन योग्य आहे तरी भाविकांची सोय लक्षात घेता देवल कमिटी व पुरोहितांनी आपसामध्ये योग्य समन्वय साधावा व समस्त भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे 


वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित वर्गासाठी घालून दिलेले नियम जाचक असून पुरोहित संघाची अभिषेक सुरू ठेवण्याची पूर्वपार व परंपरागत पद्धत सुरू ठेवावी ही मागणी योग्य असून वैजनाथ मंदिर विश्वस्त समिती व त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पुरोहित संघाने भाविकांची सोय लक्षात घेऊन आपसात योग्य समन्वय साधावा अशी मागणी समस्त भाविक वर्ग, परळीकर व आम जनतेतून होत आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग असल्याने प्रभू वैजनाथ मंदिरातील महत्त्व व पावित्र्य भाविक वर्गामध्ये खूप मोठे आहे बीड जिल्हा नव्हे तर राज्य व परराज्यातूनही मोठा भाविक वर्ग या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो बाहेरून येणाऱ्या तसेच स्थानिक भाविक वर्गाची अभिषेक करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे परंतु मागील काही दिवसा पूर्वी वैद्यनाथ देवल कमिटी विश्वस्थांनी पुरोहित संघांना जाचक अटी घालून दिले आहेत. यामुळे पुरोहित वर्ग संतप्त असून पूर्वीप्रमाणेच अभिषेक चालू ठेवावेत व पुरोहित संघाला दिलासा द्यावा अशी मागणीचे निवेदन पुरोहित संघाने तहसीलदार यांच्यामार्फत संबंधितांना दिली आहे. हे सर्व चालू असताना सकाळचे अभिषेक बंद असल्यामुळे भाविक वर्गातही मोठा असंतोष व नाराजीचा सूर उमटला आहे .


*पावसाचे प्रमाण वाढावे म्हणून वैद्यनाथ प्रभूस पाणी अर्पण करण्यात यावे*


पावसाचे अत्यल्प प्रमाण पाहता समस्त भाविकांचे प्रभुवैद्यनाथाला कावडीद्वारे व कळसाद्वारे अभिषेक करण्याची परंपरा आहे यामुळे पृथ्वीवर पावसाचे प्रमाण योग्य राहील अशी भाविकांची धारणा व श्रद्धा असते त्यामुळे पुरोहितांद्वारे अभिषेक व पाणी घालण्याची परंपरा चालू ठेवावी अशी ही मागणी श्री अभय कुमार ठक्कर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....