इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

डॉ. संतोष मुंडे यांनी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद !

 डॉ. संतोष मुंडे यांनी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद !


राज्याचे कृषी मंत्री ना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जागा वाढीसाठी प्रयत्न करणार : डॉ संतोष मुंडे

परळी : प्रतिनिधी....

      राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली असून,भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा पाहावयास मिळत आहे, परळी येथील साई स्पोर्ट्स अकॅडमी परळी येथे राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी भेट देऊन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विविध विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी, प्रयत्न करणार असल्याचे डॉ मुंडे यावेळी म्हणाले.


गेल्या अनेक दिवसांपासून तरुण हे पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते, राज्य शासनाने भरतीची घोषणा केली परंतु जागेचा आणि भरतीतील उमेदवार यांची तफावत पाहता जागा अत्यंत कमी असल्याचे पाहावयास मिळत आहे. 


महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी 17 हजार 471 रिक्त पदांकरिता संपूर्ण महाराष्ट्रात मैदानी चाचणी सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे एका पदासाठी 101 अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यामुळे जागा कमी आणि उमेदवार जास्त अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, 


दिनांक 21 जून रोजी परळी येथील साई स्पोर्ट्स अकॅडमी परळी येथे राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी भेट देऊन पोलीस भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेऊन, राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यामार्फत जागा वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ संतोष मुंडे यांनी यावेळी सांगितले.

          जवळपास राज्यातील पोलीस भरतीमध्ये एका पदासाठी तब्बल 101 अर्ज आलेला असून पुरेशा जागा अभावी भरतीमध्ये, आणखीन जागा वाढवल्या पाहिजेत, असे मत महाराष्ट्र राज्य दिव्यंग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी व्यक्त केले.

                           -डॉ संतोष मुंडे

                   _______

अनेक दिवसांपासून तरुण हे पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु शासनामार्फत निघालेली भरती ही अपुरी असून, ना.धनंजयजी मुंडे, व डॉ संतोष मुंडे यांच्या मार्फत भरतीच्या वाढीसाठी आम्ही मागणी केली आहे.

- आर बी चव्हाण 

पोलीस भरती प्रशिक्षक

(साई स्पोर्ट्स करिअर अकॅडमी)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या