इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दुष्काळ, शेतकरी, पीककर्ज, महिला सबलीकरणासह मांडले महत्वपुर्ण मुद्दे

खासदार म्हणून बजरंग सोनवणेंची पहिल्या बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीस प्रमुख उपस्थिती 



बीड,प्रतिनिधी....

     बीड लोकसभेत निवडून आल्यानंतर  खासदार म्हणून बजरंग सोनवणेंची पहिल्या बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत दुष्काळ, शेतकरी, पीककर्ज, महिला सबलीकरणासह अन्य  महत्वपुर्ण मुद्दे त्यांनी मांडले. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.

        सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही. यासाठी शेतकरी उपोषण करतात, आंदोलन करतात, परंतु त्यांना न्याय का मिळत नाही. शेतकर्यांना पिकविमा मिळाला पाहिजे अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी यावेळी बैठकीत मांडली. जिल्ह्यात वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिला सबलीकरणासाठी जास्तीचा निधी देणे आवश्यक असून या विषयाकडे गांभिर्याने पहावे, बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे. सदरील शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी बँका शेतकऱ्यांची आडवणूक करत आहेत, अशा ठिकाणी बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ज्याठिकाणी बँकाचे अधिकारी चांगले काम करत आहेत, अशांचा सत्कारही करू. परंतू शेतकऱ्यांना विना अडथळा कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. बीड जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासह महापुरूषांचे पुतळे उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी बैठकीत केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या