इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

शासनाची भूमिका माय-बापाची असावी

प्रा.लक्ष्मण हाके आणि सहकाऱ्यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने बघावे- पंकजा मुंडेंचे ट्विट


शासनाची भूमिका माय-बापाची असावी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.अशा प्रकारचे ट्विट भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
       ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सरकारचे लक्ष वेधले आहे.आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला.

"राज्याचे शासन आणि महाराष्ट्रातील सर्वच नेते म्हणताय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही याचं आम्हाला राज्य शासनाकडून लेखी प्रमाणपत्र पाहिजे. ओबीसींना कळत नाही असं शासनाने समजू नये. आमचा समाज शांती प्रिय आहे, आम्ही सामाजिक तेढ निर्माण करत नाही," असे लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.

तसेच "जरांगे साहेब गेली सात- आठ महिने सांगत आहेत की ओबीसी आमचा भाऊ आहे आमच्यात भाईचारा दुसरीकडे ते ओबीसी नेत्यांना ते टार्गेट करताना दिसतात. मनोज जरांगेंना शासनामार्फत रेड कार्पेट अंथरले जाते. मात्र आम्ही उपोषण करतो तेव्हा शासनाकडून साधी दखलही घेतली जात नाही. हाच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का?" असा सवालही लक्ष्मण हाके यांनी विचारला.

दरम्यान, आज खासदार संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. मात्र लक्ष्मण हाके आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगावं आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया हाकेंनी दिली. उद्या लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यासासाठी मुंबईला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....