इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन


बीड, दि. 6 (जि. मा. का.) :- सध्या खरीप 2024 हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे खते व नंतर औषधे खरेदी करत असतात त्यांना उत्तम दर्जाचे खते बियाणे व औषध उपलब्ध व्हावे, योग्यरीत्या किमतीत उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्यात गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाची कार्य कक्षा तालुकास्तरावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी तथा निरीक्षक यांच्यापर्यंत आहे


      खरीप हंगामात या दोन्ही कार्यालयात तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यांची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत अशी आहे. याशिवाय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांची भरारी पथके कार्यरत आहे.


       जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी व जिल्हा गुणवत्ता निरिक्षक यांचे भरारी पथक कार्यरत आहे. याशिवाय राज्यस्तरावरील कक्षाचे व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच कृषी उपसंचालक, उपविभागाची कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांचे तंत्र अधिकारी यांनाही निरीक्षकाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे.


       खते बियाणे व औषधी संबंधित काही अडचणी असल्यास शेतकरी त्यांच्या स्थानिक कार्यक्षेत्रातील तालुका अथवा पंचायत समिती कक्षाकडे अथवा भरारी पथकाकडे करू शकतात या विविध स्तरावरील पक्षांचे तसेच भरारी पथकांचे दूरध्वनी क्रमांक शेतकरी वर्गासाठी खुले करण्यात आलेले आहेत. त्यांची यादी सोबत जोडली आहे.


       विशिष्ट कंपनी अथवा ग्रेड अथवा वाणाचा कोणीही आग्रही ठेवू नये. बाजारात बियाण्यांची असंख्य प्रकार उपलब्ध आहेत त्यानुसार पर्याय ठेवावा. विशिष्ट ग्रेडचे खत उपलब्ध नसल्यास कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकरीस्तरावर विविध खते सरळ खतांपासून तयार करणे शक्य आहे. तेव्हा पुनश्च आवाहन कोणत्याही विशिष्ट बियाण्याचे वाण उत्पादक अथवा खतांचे विशिष्ट कंपनीचे विशिष्ट ग्रेड यांचा आग्रह ठेवू नये. अशी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


                                                *******



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या