23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन


बीड, दि. 6 (जि. मा. का.) :- सध्या खरीप 2024 हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे खते व नंतर औषधे खरेदी करत असतात त्यांना उत्तम दर्जाचे खते बियाणे व औषध उपलब्ध व्हावे, योग्यरीत्या किमतीत उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्यात गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाची कार्य कक्षा तालुकास्तरावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी तथा निरीक्षक यांच्यापर्यंत आहे


      खरीप हंगामात या दोन्ही कार्यालयात तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यांची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत अशी आहे. याशिवाय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांची भरारी पथके कार्यरत आहे.


       जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी व जिल्हा गुणवत्ता निरिक्षक यांचे भरारी पथक कार्यरत आहे. याशिवाय राज्यस्तरावरील कक्षाचे व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच कृषी उपसंचालक, उपविभागाची कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांचे तंत्र अधिकारी यांनाही निरीक्षकाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे.


       खते बियाणे व औषधी संबंधित काही अडचणी असल्यास शेतकरी त्यांच्या स्थानिक कार्यक्षेत्रातील तालुका अथवा पंचायत समिती कक्षाकडे अथवा भरारी पथकाकडे करू शकतात या विविध स्तरावरील पक्षांचे तसेच भरारी पथकांचे दूरध्वनी क्रमांक शेतकरी वर्गासाठी खुले करण्यात आलेले आहेत. त्यांची यादी सोबत जोडली आहे.


       विशिष्ट कंपनी अथवा ग्रेड अथवा वाणाचा कोणीही आग्रही ठेवू नये. बाजारात बियाण्यांची असंख्य प्रकार उपलब्ध आहेत त्यानुसार पर्याय ठेवावा. विशिष्ट ग्रेडचे खत उपलब्ध नसल्यास कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकरीस्तरावर विविध खते सरळ खतांपासून तयार करणे शक्य आहे. तेव्हा पुनश्च आवाहन कोणत्याही विशिष्ट बियाण्याचे वाण उत्पादक अथवा खतांचे विशिष्ट कंपनीचे विशिष्ट ग्रेड यांचा आग्रह ठेवू नये. अशी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


                                                *******



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?