इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन


बीड, दि. 6 (जि. मा. का.) :- सध्या खरीप 2024 हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे खते व नंतर औषधे खरेदी करत असतात त्यांना उत्तम दर्जाचे खते बियाणे व औषध उपलब्ध व्हावे, योग्यरीत्या किमतीत उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्यात गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाची कार्य कक्षा तालुकास्तरावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी तथा निरीक्षक यांच्यापर्यंत आहे


      खरीप हंगामात या दोन्ही कार्यालयात तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यांची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत अशी आहे. याशिवाय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांची भरारी पथके कार्यरत आहे.


       जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी व जिल्हा गुणवत्ता निरिक्षक यांचे भरारी पथक कार्यरत आहे. याशिवाय राज्यस्तरावरील कक्षाचे व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच कृषी उपसंचालक, उपविभागाची कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांचे तंत्र अधिकारी यांनाही निरीक्षकाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे.


       खते बियाणे व औषधी संबंधित काही अडचणी असल्यास शेतकरी त्यांच्या स्थानिक कार्यक्षेत्रातील तालुका अथवा पंचायत समिती कक्षाकडे अथवा भरारी पथकाकडे करू शकतात या विविध स्तरावरील पक्षांचे तसेच भरारी पथकांचे दूरध्वनी क्रमांक शेतकरी वर्गासाठी खुले करण्यात आलेले आहेत. त्यांची यादी सोबत जोडली आहे.


       विशिष्ट कंपनी अथवा ग्रेड अथवा वाणाचा कोणीही आग्रही ठेवू नये. बाजारात बियाण्यांची असंख्य प्रकार उपलब्ध आहेत त्यानुसार पर्याय ठेवावा. विशिष्ट ग्रेडचे खत उपलब्ध नसल्यास कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकरीस्तरावर विविध खते सरळ खतांपासून तयार करणे शक्य आहे. तेव्हा पुनश्च आवाहन कोणत्याही विशिष्ट बियाण्याचे वाण उत्पादक अथवा खतांचे विशिष्ट कंपनीचे विशिष्ट ग्रेड यांचा आग्रह ठेवू नये. अशी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


                                                *******



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट