इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार - प्रा.टी.पी.मुंडे


प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

ओबीसींच्या प्रश्नासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावामध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. या आमरण उपोषणाला त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. 


  मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असल्याने उपोषण स्थगित केले त्याच्या विरोधात ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसीचे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असून ते आरक्षण मराठा समाजाला देता कामा नये व सगेसोयरे कायद्याला विरोध  या दोन्ही मागणीसाठी  जालना येथील वडीगोद्री या गावांमध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे. याच आंदोलनाला ओबीसी बहुजन पार्टीचा पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे परंतु ओबीसी मध्ये आरक्षण दिल्यास सरकारला ओबीसी समाज त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.


   या अगोदर सुद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे व सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती परंतु त्यांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून आणि ओबीसीचे आरक्षण आबादीत ठेवण्यासाठी ओबीसीचे महाराष्ट्रातील नेते त्यामध्ये छगन भुजबळ , प्रकाश अण्णा शेंडगे, प्रा.टी.पी.मुंडे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. २२ एल्गार सभा घेऊन ओबीसी समाजामध्ये जनजागृती निर्माण केली  त्यांनी जरांगेच्या मागणीला कडाडून विरोध दर्शवला परिणामी सरकारने मराठा समाजास वेगळे दहा टक्के आरक्षण दिले परंतु आता सुद्धा पुन्हा जरांगे यांनी तीच मागणी केल्याने ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल  असा इशारा त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....