इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार - प्रा.टी.पी.मुंडे


प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

ओबीसींच्या प्रश्नासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावामध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. या आमरण उपोषणाला त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. 


  मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असल्याने उपोषण स्थगित केले त्याच्या विरोधात ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसीचे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असून ते आरक्षण मराठा समाजाला देता कामा नये व सगेसोयरे कायद्याला विरोध  या दोन्ही मागणीसाठी  जालना येथील वडीगोद्री या गावांमध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे. याच आंदोलनाला ओबीसी बहुजन पार्टीचा पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे परंतु ओबीसी मध्ये आरक्षण दिल्यास सरकारला ओबीसी समाज त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.


   या अगोदर सुद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे व सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती परंतु त्यांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून आणि ओबीसीचे आरक्षण आबादीत ठेवण्यासाठी ओबीसीचे महाराष्ट्रातील नेते त्यामध्ये छगन भुजबळ , प्रकाश अण्णा शेंडगे, प्रा.टी.पी.मुंडे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. २२ एल्गार सभा घेऊन ओबीसी समाजामध्ये जनजागृती निर्माण केली  त्यांनी जरांगेच्या मागणीला कडाडून विरोध दर्शवला परिणामी सरकारने मराठा समाजास वेगळे दहा टक्के आरक्षण दिले परंतु आता सुद्धा पुन्हा जरांगे यांनी तीच मागणी केल्याने ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल  असा इशारा त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या