दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना खासदारकीचे पहिले पत्र

खासदारकीचे पहिले पत्र : मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या:खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना पत्र 

केज (बीड) :- पाच दिवसापासून कुणबी मराठा समाजातील सर्व सगळ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना लाभ देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा देत नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपालांनी या आंदोलनाची तात्काळ दाखल घ्यावी यासंदर्भात पहिले पत्र दिले आहे. 

        राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे यांनी खासदारकीचे पहिले पत्र मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्याच्या संदर्भाने राज्यपालांच्या नावाने दिले आहे. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, मागील पाच दिवसा पासून मराठा संघर्षयोद्धा मनोज  जरांगे पाटील हे सर्व मराठ्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांचा लाभ द्यावा. या मागणीसाठी दि. ८ जून पासून मागील पाच दिवसा पासून उपोषणास बसले आहेत. दिवसें दिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. याची दखल  राज्यपालांनी घ्यावी.त्यांच्या मागण्या संदर्भात राज्य शासन उदासीन असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. हे पत्र त्यांनी राज्यपालांच्या नावाने ईमेलवर पाठविले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....