परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना खासदारकीचे पहिले पत्र

खासदारकीचे पहिले पत्र : मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या:खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना पत्र 

केज (बीड) :- पाच दिवसापासून कुणबी मराठा समाजातील सर्व सगळ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना लाभ देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा देत नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपालांनी या आंदोलनाची तात्काळ दाखल घ्यावी यासंदर्भात पहिले पत्र दिले आहे. 

        राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे यांनी खासदारकीचे पहिले पत्र मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्याच्या संदर्भाने राज्यपालांच्या नावाने दिले आहे. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, मागील पाच दिवसा पासून मराठा संघर्षयोद्धा मनोज  जरांगे पाटील हे सर्व मराठ्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांचा लाभ द्यावा. या मागणीसाठी दि. ८ जून पासून मागील पाच दिवसा पासून उपोषणास बसले आहेत. दिवसें दिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. याची दखल  राज्यपालांनी घ्यावी.त्यांच्या मागण्या संदर्भात राज्य शासन उदासीन असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. हे पत्र त्यांनी राज्यपालांच्या नावाने ईमेलवर पाठविले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!