इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध

 शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध


महामार्ग रद्द अधिसूचना सरकारने काढावी; बाधित शेतकऱ्यांची मागणी


परळी / प्रतिनिधी


पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ मार्गास राज्यात शेतकऱ्यांना कडाडून विरोध होत असून राज्य सरकार हा प्रस्तावित महामार्गास स्थगिती दिल्याचे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे.स्थगिती नकोय महामार्ग रद्द करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात यावी अन्यथा बाधित शेतकरी आपल्या कुटूंबासह हे आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशारा परळी-अंबाजोगाई येथील बाधित शेतकऱ्यानी सरकारला दिला आहे.


नागपूरपासून गोव्यादरम्यान महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे जोडण्यासाठी, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी मागणी नसताना देखील समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आणखी लांब पल्ल्याचा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आला होता.राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या उभारणीस तब्बल 86 हजार कोटी खर्च येणार असून या महामार्गासाठी 27 हजार एक्कर पेक्षा अधिक शेतजमीन शासन संपादित करणार आहे.नागपूर-रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना देखील हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे लक्ष्यात येताच राज्यात या महामार्गास तीव्र विरोध होत आहे.


मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग हा प्रस्तावित असून हा मार्ग अत्यन्त सुपीक आणि बागायती जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे मराठवड्यातील खूप मोठी बागायत जमीन या महामार्गामध्ये जाऊन शेतकरी कायमचे भूमिहीन होणार आहेत. या शक्तिपीठ महामार्गास शेतकरी विरोध करण्याच्या अनुषंगाने 13 एप्रिल 2024 रोजी परळी येथे मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांची विभागीय बैठक संपन्न झाली.याबाबत शेतकऱ्यांनी मराठवाडाभर संवाद यात्रा देखील काढली तर अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन देखील झाली.


सरकार कडून हा महामार्ग होणार नाही असे सांगण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला जमीन संपादित करण्यासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आलेली आहे ही बाब शेतकऱ्यांच्या लक्ष्यात आलेली असल्याने हे आंदोलन अधिक तीव्र बनले.शुक्रवार दि 21 रोजी बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई येथील शेकडो बाधित शेतकऱ्यांची बैठक वरवटी व धायगुडा पिंपळा या ठिकाणी संपन्न झाली.या बैठकीत सरकारला शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन महामार्ग बनवायचा असेल तर  भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरकारला देण्यात आला.या प्रसंगी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष एड.अजय बुरांडे यांच्यासह माजी न्यायाधीश बी.आर तिडके, अँड.एल.एन.शिंदे, वरवटी गावचे सरपंच सुधीर चाटे सह मोठ्या संख्येने शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते.


"शक्तिपीठ श्रद्धेचा भावनिक मुद्दा धरून मागणी नसताना देखील हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन हजारो एक्कर सुपीक, बागायती जमीन संपादित करून शेतकऱ्यांना कायम स्वरूपी भूमिहीन करत भिकेला लावणारा हा शक्तीपिठ महामार्ग नसून कंत्राटदार हित महामार्ग आहे.विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी स्थगिती दिल्याची घोषणा सत्ताधारी करत आहेत.यापूर्वी देखील अतिरीक्त ऊस अनुदान, सोयाबीन, कापूस भावांतर याबद्दल देखील सत्ताधा-यांनी घोषणा केली मात्र शून्य अंमलबजावणी झाली."

-ॲड.अजय बुरांडे

शेतकरी नेते, बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....