दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

#mbnews# 'विधानसभेला पुरे पाडा' चा फटका कोणाला बसणार?

 लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही 'पुरे पाडा' चे शस्त्र - जरांगे-पाटलांचे बीडमधून सूचक वक्तव्य

बीड, प्रतिनिधी.....
           बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही कोणालाच घाबरत नाहीत.आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे  ठणकावून सांगत लोकसभेप्रमाणे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून  येऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी  मराठा समाजाला केले.
          मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये आज शांतता रॅलीला संबोधीत केले. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती.आता जरांगेंनी पुन्हा एकदा 'विधानसभेला पुरे पाडा' असे आवाहन समाजाला केले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या शांतता रॅलींनी संपुर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आज बीड येथे झालेल्या शांतता रॅलीत तुफान गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

विधानसभेला पुरे पाडा
------------------------

बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही भित नाहीत,आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे जरांगे यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून  येऊ देऊ नका, असे आवाहनच त्यांनी उपस्थित मराठा समाजाला केले.  

सगेसोयरे आणि सरसकट आरक्षण द्या
-------------------------
            मराठा आणि कुणबी हा एकच असल्याचा उल्लेख केला. हैदराबादला त्याच्या नोंदी सापडल्या आहे. सगेसोयरे आणि सरसकट आरक्षण द्या ही आपली मागणी कायम आहे असेही ते यावेळी म्हणाले. मराठा समाजाचे दुख: ना महायुतीला दिसत आहे ना महाविकास आघाडीला. तु मारल्या सारखं कर आणि मी रडल्या सारखं करतो असं सध्या सुरू आहे असेही ते म्हणाले.

तर पुन्हा मुंबईच्या दिशेने यावे लागेल
------------------------

 गेली 70 वर्षे पुढाऱ्यांना आम्हीच मोठं केलं. त्यांची मुलंबाळ आमदार मंत्री झाले. पण मराठा समाज तिकडेच आहे. त्याला आता हक्काचे आरक्षण हवे आहे. त्यांना अधिकारी व्हायचे आहे. त्यामुळे सरकारने वेळीच निर्णय घेतला पाहीजे. सरकारला मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर तसे झाले नाही तर पुन्हा मुंबईच्या दिशेने यावे लागेल असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.

जाती पेक्षा कोणी मोठा नाही
--------------------
जाती पेक्षा आपल्याला समोर कोणी मोठा नाही. फडणवीस हे भुजबळांना हाताशी धरून काम करत आहेत. त्यामुळे भाजप संपत चालली आहे. त्यामुळे मराठा समाजाने एकसंघ राहीलं पाहीजे. मतदान मोठ्या प्रमाणात करा असे जरांगे यांनी सांगितले. 

'विधानसभेला पुरे पाडा' चा फटका कोणाला बसणार?
-------------------------------

लोकसभेला 'पाडा' असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले होते. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसला. महायुतीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. खास करून मराठवाड्यात भाजपच्या उमेदवारांना दारूण पराभव स्विकारावा लागला. आता जरांगेंनी पुन्हा एकदा 'विधानसभेला पुरे पाडा' असे आवाहन समाजाला केले आहे. त्यांच्या या आवाहानाचा फटका कोणाला बसणार हे येत्या काळात बघावे लागणार आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....