परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

 निराधारांना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प


प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत


बीड । दि. २३ ।  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. निराधारांना आधार देणारा आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प' अशा शब्दात मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केलेला आहे. गरिब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देताना भविष्यातील ‘विकसित भारताची' रचना या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेली आहे.


कृषी उत्पादनाला दिलेली प्राथमिकता अन्नदात्या बळीराजाचा सन्मान वाढवणारी आहे. तसेच महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटींची केलेली तरतूद, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटी घर, शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतूद, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच वर्ष मोफत अन्नधान्य' या सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या तरतुदी आहेत. एकंदरीत निराधाराना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा हा अर्थसंकल्प आहे. या सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार' अशा भावना प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!