23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

 निराधारांना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प


प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत


बीड । दि. २३ ।  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. निराधारांना आधार देणारा आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प' अशा शब्दात मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केलेला आहे. गरिब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देताना भविष्यातील ‘विकसित भारताची' रचना या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेली आहे.


कृषी उत्पादनाला दिलेली प्राथमिकता अन्नदात्या बळीराजाचा सन्मान वाढवणारी आहे. तसेच महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटींची केलेली तरतूद, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटी घर, शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतूद, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच वर्ष मोफत अन्नधान्य' या सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या तरतुदी आहेत. एकंदरीत निराधाराना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा हा अर्थसंकल्प आहे. या सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार' अशा भावना प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?