इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

 निराधारांना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प


प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत


बीड । दि. २३ ।  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. निराधारांना आधार देणारा आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प' अशा शब्दात मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केलेला आहे. गरिब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देताना भविष्यातील ‘विकसित भारताची' रचना या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेली आहे.


कृषी उत्पादनाला दिलेली प्राथमिकता अन्नदात्या बळीराजाचा सन्मान वाढवणारी आहे. तसेच महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटींची केलेली तरतूद, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटी घर, शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतूद, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच वर्ष मोफत अन्नधान्य' या सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या तरतुदी आहेत. एकंदरीत निराधाराना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा हा अर्थसंकल्प आहे. या सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार' अशा भावना प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या