इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा

 परळीत डेंगूची साथ; नगरपालिकेने जंतुनाशक फवारणी करावी - प्रा.विजय मुंडे

सात दिवसाच्या आत संपूर्ण परळी शहरात फवारणी करावी अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा! 



परळी वैजनाथ प्रतिनिधी 

परळी शहरामध्ये सध्या डेंगूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नगरपालिका प्रशासनाने कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली नाही त्यामुळे डेंगूची साथ पसरत चालली आहे येत्या सात दिवसांमध्ये फवारणीला सुरुवात करावी अन्यथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल तसेच पालिकेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा परळी मार्केटचे माजी उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी दिला आहे. 

   सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गेल्या चार दिवसापासून शहरासह परिसरात चांगल्या प्रकारचा पाऊस झाला असून शहरात अनेक ठिकाणी नाल्या दुरुस्त नाहीत सगळीकडे खड्डे असल्यामुळे तेथे पावसाचे पाणी साठल्यामुळे तेथे डेंगूच्या मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे अनेक शहरांमध्ये डेंगू चे रुग्ण पहावयास मिळत असून त्यामध्ये वाढ होत आहे. शहरातील दवाखान्यामध्ये रुग्णांची वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पर्यायाने नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. 

   नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याची खेळू नये. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यांनी यामध्ये विशेष लक्ष घालावे आणि येत्या सात दिवसांमध्ये जंतुनाशक परळी शहरांमध्ये फवारणी करावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी नगरपालिकेवर महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येईल त्याची सर्वस्व जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाचे असेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या