इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा

 जन्ममरणाची येरझार चुकवायची असेल तर आपल्या ह्रदयमंदीरात हरीला साठवावे लागेल- ह.भ.प.पांडूरंग महाराज घुले


परळी(प्रतिनिधी) 

 जन्म आणि मृत्यूची येरझार थांबवून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या हृदय मंदिरात हरीला साठवले पाहिजे.वास्तविक हरिहर प्रत्येकाच्या आत मध्ये विराजमान असतोच परंतु स्वतः मधील हरी दिसणे हे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नसते . त्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते तेव्हाच आपल्यातील असलेल्या हरीचे दिव्यदृष्टीने दर्शन घडत असते असे प्रतिपादन देऊ येतील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह भ प पांडुरंग महाराज घुले यांनी परळी वैजनाथ येथे चालू असलेल्या संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे कीर्तन सेवेच्या प्रसंगी प्रतिपादन केले.

 संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात रविवार दि.28 जुलै पासुन ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.यानिमीत्त रात्री 7 ते 10 या वेळेत ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे हरिकीर्तन पार पडले.यावेळी संत तुकारामांच्या सांठविला हरी ।

जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥

त्यांची सरली येरझार ।

जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥

हरी आला हाता ।

मग कैंची भय चिंता ॥२॥

तुका म्हणे हरी ।

कांहीं उरों नेदी उरी ॥३॥ या अभंगावर विमोचन करताना वारकरी सांप्रदायाने संपुर्ण मानवी कल्याणाची शिकवण दिली असल्याचे सांगितले.यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.दि.३१ जुलै रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख,दि.०१ ऑगस्ट रोजी ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे,दि.०२ ऑगस्ट रोजी ह.भ.प.अर्जुन महाराज लाड,दि.०३ ऑगस्ट रोजी ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरिकीर्तन होणार आहे.

नगर प्रदक्षिणा,गुणवंतांचा सत्कार व रक्तदान शिबीर

 अखंड हरिनाम सप्ताहात गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा.रक्तदान शिबीर व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन दि.३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. संत सावतामाळी मंदिर येथुन सावता महाराज पालखी सोहळा निघणार आहे. मंगल कलश, ध्वज पताका, टाळ,विणा,मृंदग,बॅन्ड लेझीमच्या निनादात दिंडी सोहळा निघणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या