इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

लवकरच नियोजन करू- मुख्याधिकारी कांबळे

 नागापूर धरण भरल्यामुळे परळी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा - अश्विन मोगरकर 


परळी,  प्रतिनिधी.      

सध्या परळीला पाणीपुरवठा करणारे मुख्य नागापूर धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी एका निवेदनाद्वारे परळीचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्याकडे केली आहे. 

    परळी शहराला नागापूर येथील वाण धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या शहरातील नागरिकांना पाच दिवसाआड पाणी सोडले जाते. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी पुरत नसल्याने सार्वजनिक व खाजगी बोअरचा वापर होत आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी होत आहे. तसेच सार्वजनिक बोअर चा वापर वाढल्यामुळे नगरपरिषदेवर लाईटबिलाचा अतिरिक्त बोजा वाढत आहे. यापूर्वी पाणीपुरवठ्या साठी दोनच टाक्या होत्या. आता विशेष पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात टाक्यांची भर पडली आहे. तसेच नवीन जलवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. तरीही पाणी मात्र पाचदिवसाआड का असा सवाल अश्विन मोगरकर यांनी केला आहे.  नागापूर धरणात पाणी कमी असताना आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते ही बाब लक्षात येऊ शकते. परंतु सध्या पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात नागापूर धरण 100% भरत आले आहे. यापूर्वीही अनेक वेळा अश्विन मोगरकर यांनी नगरपरिषदेला सदर मागणीसाठी पाठपुरावा केला आहे.

      धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता परळी शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणी देणे नगरपालिकेला शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. या मागणीची आपण दखल घेऊन लवकरच अशा प्रकारचे नियोजन करू असे मुख्याधिकारी कांबळे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या