23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

लवकरच नियोजन करू- मुख्याधिकारी कांबळे

 नागापूर धरण भरल्यामुळे परळी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा - अश्विन मोगरकर 


परळी,  प्रतिनिधी.      

सध्या परळीला पाणीपुरवठा करणारे मुख्य नागापूर धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी एका निवेदनाद्वारे परळीचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्याकडे केली आहे. 

    परळी शहराला नागापूर येथील वाण धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या शहरातील नागरिकांना पाच दिवसाआड पाणी सोडले जाते. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी पुरत नसल्याने सार्वजनिक व खाजगी बोअरचा वापर होत आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी होत आहे. तसेच सार्वजनिक बोअर चा वापर वाढल्यामुळे नगरपरिषदेवर लाईटबिलाचा अतिरिक्त बोजा वाढत आहे. यापूर्वी पाणीपुरवठ्या साठी दोनच टाक्या होत्या. आता विशेष पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात टाक्यांची भर पडली आहे. तसेच नवीन जलवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. तरीही पाणी मात्र पाचदिवसाआड का असा सवाल अश्विन मोगरकर यांनी केला आहे.  नागापूर धरणात पाणी कमी असताना आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते ही बाब लक्षात येऊ शकते. परंतु सध्या पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात नागापूर धरण 100% भरत आले आहे. यापूर्वीही अनेक वेळा अश्विन मोगरकर यांनी नगरपरिषदेला सदर मागणीसाठी पाठपुरावा केला आहे.

      धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता परळी शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणी देणे नगरपालिकेला शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. या मागणीची आपण दखल घेऊन लवकरच अशा प्रकारचे नियोजन करू असे मुख्याधिकारी कांबळे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?