इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे

 शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे

शासन प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी सोमवार दिनांक 22 जुलै पासून राज्यभरात शासनास स्मरणपत्र व निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे *ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन एक हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात यावी

मुला मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे

 प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे

 या सह समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षात शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे अनेक वेळा आंदोलन करून निवेदन देऊनही सरकारने दुर्लक्ष केले यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्याची निवेदन दिले आंदोलनाचा भाग म्हणूनच जालना येथील गांधी चमन येथे 28 नोव्हेंबर 2023 रोजी दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले पालकमंत्र्याच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले व दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अतुल सावे मंत्री छगन भुजबळ मंत्री संदिपान भुमरे मंत्री संजय राठोड आमदार नारायण कुचे आमदार नमिता मुंदडा आमदार मनीषा कायंदे जालना जिल्हा जिल्हाधिकारी व विविध विभागाचे सचिव यांच्यासह समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले परंतु आश्वासनाशिवाय आजपर्यंत काहीही मिळाले नाही या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यात प्रत्येक जिल्हात तालुक्यात शासनाला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागोचा नारा दिला आहे.

       यासाठी धनंजय कुलकर्णी श्रीकांत जोशी विजया कुलकर्णी अँड राजेंद्र पोदार अँड बलवंत नाईक इश्वर दिक्षित शाम कुलकर्णी अशोक वाघ उदय जोशी अनिल डोईफोडे संतोष कुलकर्णी किशोर पाठक संजय देशपांडे प्रज्ञा भिडे स्वप्निल केळकर अँड भानुदास शौचे अँड शेखर जोशी अनिल दिक्षित प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या सह राज्यातील समन्वयक परिश्रम घेत आहेत अशी माहिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!