23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?

 मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?



मुंबई, प्रतिनिधी....

     परळीसह बीड रेल्वेप्रश्नांवर मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भातील प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
          केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आज ना.धनंजय मुंडे व भाजप राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय  मुंडे यांच्या समवेत शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले.


रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?
------------------------

         परळी वैद्यनाथ-परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण संदर्भात कुठल्याही परळीकराचे राहते घर बाधित होऊ नये, परळी येथून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, नांदेड-पनवेल एक्सप्रेस मुंबई पर्यंत विस्तारित करावी, घाटनांदूर येथे ठराविक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यांसह बीड जिल्ह्यातील विविध रेल्वे मागण्यांच्या संदर्भात आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची  भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली.संबंधित मागण्यांवर सकारात्मक विचार करून लोकहितार्थ व योग्य निर्णय घेतले जातील, असा शब्द श्री.वैष्णव यांनी दिला आहे.

----------------------------------------------------






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?