इमेज
सामाजिक कार्यकर्ते संतोष  शिंदे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी; सकल मराठा समाजाचे निवेदन परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भैय्या (जीवनराव) शिंदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संतोष शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा वस्तुस्थितीला धरून नसून संबंधित फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सदर घटना ही किरकोळ मतभेदातून घडलेली असून, चोरी करणे किंवा गंभीर स्वरूपाची इजा पोहोचविणे असा कोणताही हेतू संतोष शिंदे यांचा नव्हता, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे म्हटले आहे की, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या संतोष भैय्या शिंदे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून परळी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या...

राजाभाऊ फड यांची पत्रकार परिषदेत घोषणा

आमजनतेचं प्रतिनिधित्व, डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास व भयमुक्त परळी यासाठी विधानसभा लढवणारच- राजाभाऊ फड 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात या विधानसभा मतदारसंघात बदल हवा आहे. तशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला आम जनतेतून मिळत आहे. त्यामुळे आम जनतेचे प्रतिनिधित्व, कागदावर नव्हे तर सगळ्यांच्या डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास आणि भयमुक्त परळी मतदारसंघ करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करणार असून यासाठी कोणत्याही परिस्थितीत आणि ठामपणे विधानसभा निवडणूक आपण लढवणारच असल्याची घोषणा राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

            महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत.काहीही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक आपण लढविणारच असल्याची घोषणा रासप नेते, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाभाऊ फड यांनी केली. सोमवारी परळी वैजनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना राजेभाऊ फड म्हणाले की, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आपण आजच्या पत्रकार परिषदेची माहिती दिली असुन महाविकास आघाडीच्या सर्व  प्रमुख नेत्यांना भेटून आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खा.सुप्रिया सुळे,जयंत पाटील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उद्यापासून भेटी घेणार आहोत.परळी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी दाखल करणार हे मात्र निश्चित असल्याचे  त्यांनी सांगितले.


Click:■ महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार!

      मागील काळात विकासाच्या फक्त गप्पा मारण्यात आल्या.कागदावरच विकास राहिला मात्र प्रत्यक्षात विकास केला गेला नाही.या विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी राजकारणात येत आहे. बारामतीच्या धर्तीवर परळीचा आम्ही विकास करून दाखवू अशीही घोषणा त्यांनी केली. जर यात कोणी काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. परळीला आता भयमुक्त करायचे आहे, जनतेच्या डोळ्याला दिसेल असा विकास करून दाखवायचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काहीही झाले तरी आमजनतेचं प्रतिनिधित्व, डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास व भयमुक्त परळी यासाठी निवडणूक लढविणारच असा आपला ठाम निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या