23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

प्रा. लक्ष्मण हाके यांचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवाहन

ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी भूमिका स्पष्ट करावी 


प्रा. लक्ष्मण हाके यांचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवाहन 


गेवराई  : ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढा उभारलाय. आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अन प्रमुखांनी या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले आहे. गेवराई मध्ये आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते ओबीसी बांधवांसमोर बोलत होते. 

         प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी जनसंवाद दौऱ्यास सुरुवात केली असून त्यांचे बीड जिल्ह्यात ओबीसी बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गेवराई येथे जनसंवाद मेळाव्यात त्यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे हे जाणीवपूर्वक ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. त्यांना निवडणूक पराभूत निवडणुकीत पराभूत करण्यासाठी बैठका देखील त्यांनी घेतल्या आहेत. जरांगे पाटील यांची लढाई ही गरजवंतांसाठी नसून केवळ वर्चस्ववादासाठी असल्याचे देखील आरोप हाके यांनी केला. ओबीसींनी आता आपल्या पायातील गुलामीचे जोखड झुगारून दिले पाहिजे तरच तुमचा आवाज विधानसभा, लोकसभेत पोहोचू शकणार आहे. गेवराई विधानसभेच्या इतिहासात एकही ओबीसी लोकप्रतिनिधी निवडून आलेला नाही, हे का होते याचा विचार करायला हवा.केवळ निवडणुका आल्या की तुमची आठवण या पुढार्‍यांना होते परंतु इतर वेळी मात्र तुम्हाला डावले जाते हा प्रकार तुम्ही ओळखा आणि स्वतःच्या हक्कासाठी एकत्र या. आज तुमचे आमचे आरक्षण वाचवण्यासाठी एकही राजकीय पुढारी भूमिका स्पष्ट करत नाही हे खरे दुर्दैव आहे. त्यांना तुमच्या मताची किंमत कळू द्या आणि जे आपल्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवा असे देखील हाके यांनी यावेळी म्हटले. तर नवनाथ वाघमारे यांनी सरकारचा आणि आमचा कोणताही संबंध नाही केवळ ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याने आम्ही हा लढा उभारला असून मुख्यमंत्री हे जातीवादी असल्याचा आरोप देखील वाघमारे यांनी केला. यावेळी प्राध्यापक पी. टी. चव्हाण यांच्यासह विविध पक्षाचे ओबीसी नेते उपस्थित होते. तसेच ओबीसी बाणव देखील मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे कायम ओबीसीच्या प्रश्नावर लढा देत आले असे प्राध्यापक हाके यांनी म्हटले. ज्यावेळी ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर संसदेला घेराव करण्यासाठी सर्व प्रमुख नेते एकत्र आले होते त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये असताना देखील या आंदोलनात भाग घेत ओबीसींचा आवाज बुलंद केला अशाच नेत्याची आता आपल्याला गरज असल्याचे देखील हाके यांनी म्हटले आहे. तसा लढा सध्या छगन भुजबळ हे लढत अजून त्यांना यामुळेच टार्गेट केले जात असल्याचे देखील हाक यांनी म्हटले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?