परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संतांच्या आनंदी जगाचे स्वप्न संविधानानेच पूर्ण होईल-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा आशावाद

संतांच्या आनंदी जगाचे स्वप्न संविधानानेच पूर्ण होईल-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा आशावाद 

नाशिक : ‘गेल्या सातशे वर्षांपासून संतांनी जे आनंदी जगाचे स्वप्न पाहिले तेच साकार करणारे भारतीय संविधान आहे. संतांनी ज्या विचारांचा जागर या महाराष्ट्रात सात शतके केला त्याच विचारांचा विजय म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला.’ असे प्रतिपादन ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. डॉ नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेतील 227 वे पुष्प  ‘संत साहित्यातील संविधान मूल्ये’ या विषयावर गुफतांना ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर बोलत होते.


 ह. भ. प. सोन्नर यांनी म्हटले की, भारतीय संविधान म्हणजे हिंदूंच्या विरोधातील कारस्थान असल्याचा अपप्रचार काही लोक कीर्तनाच्या माध्यमातून करीत असतात. परंतु वेगवेगळ्या संतांच्या अभंगांचे दाखले देत ह.भ.प. सोन्नर यांनी स्पष्ट केले की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय याच मूल्यांचा जागर करत संतांनी आनंदी जगाचे स्वप्न पाहिले आणि तीच मूल्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समाविष्ट केलेली आहेत. आपलं संविधान अमेरिकेपेक्षा प्रगल्भ असल्याचा पुरावा देताना ह.भ.प. सोन्नर म्हणाले की,  अमेरिकेत आजपर्यंत राष्ट्राध्यक्ष  पदी कोणीही महिला आलेली बसू शकली नाही,  भारतात मात्र पंतप्रधान, राष्ट्रपती यांपासून अनेक पदे महिलांनी भूषविली आहेत, भूषवत आहेत. हीच भारतीय संविधानाच सर्वसमावेशता आहे. त्यांनी संत चोखामेळा यांच्या अभंगाचा दाखला देत सांगितले की, गावकुसाबाहेर  राहणा-या चोखोबांना अभिव्यक्त होण्याचे माध्यम वारकरी परंपरेतील अभंगाने दिले. ही एकप्रकारे संविधातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुरुवात होती. सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचे सत्र झाले.

 

व्याख्यानाचे प्रास्ताविक सचिन मालेगावकर यांनी, वक्त्याचा परिचय अरुण घोडेराव यांनी तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या आयोजक संघटनेचा परिचय नितीन बागुल यांनी करून दिला. डॉ. शामसुंदर झळके यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!