इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा

 जन्मस्थान आपेगावचा  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या पाटोद्यात !


 संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा

  पाटोदा /अमोल जोशी...

         शुक्रवारी शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने पाटोद्यातून दिघोळ कडे प्रस्थान केल्यानंतर शनिवार 6 जुलै रोजी  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपेगाव   पाटोदा नगरीत दाखल होणार असून पालखी सोहळा शहरात आल्यावर नगरपंचायत , पोलीस पाटील व  नागरिक यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत शिवाजी चौक येथे  करण्यात येते यावेळी बँड पथक, ढोली बाजा टाळ मृदुंगाच्या गजरात हा सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून बाजार तळ भामेश्र्वर मंदिर मार्गे काळा हनुमान ठाणा येथे मुक्कामी पोहचेल. या ठिकाणी सर्व वारकरी भाविक भक्ताची जेवण व निवास व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा प्रदीप सरवदे यांच्या वतीने भोजन व्यवस्था केली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत जोशी व अश्रूबा जाधव यांच्या वतीने नाश्ता व चहापाणी व्यवस्था केली आहे तसेच मुळे वस्ती व बिनवडे वस्ती येथेही चहा नाश्ता होणार आहे.  संत श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे जन्मगाव असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथून हा पालखी सोहळा शेकडो वर्षांपासून सुरू असून या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचे आई, वडील ,व सर्व भावंडांच्या पादुका पालखीत असतात हे विशेष आहे शिस्तप्रिय पालखी सोहळा म्हणून या दिंडीची ओळख आहे.      

● ७०० वारकऱ्यांचा सहभाग 

     या पालखी सोहळ्यात साधारण सातशे वारकरी सोबत असून सर्व वारकरी हे पालखी सोहळ्या सोबतच राहतात एकही वारकरी दिंडी सोडून इकडे तिकडे जात नाहीत कुणी काहीं अन्नदान ,किंवा साहित्य दिले तरी हात लावत नाहीत  अतिशय  शिस्तबद्ध पालखी सोहळा   म्हणून यांची  ओळख आहे.   

● घोडा रिंगण ......

  सोमवारी घोडा रिंगण या पालखी सोहळ्याचे घोडा रिंगण सोमवारी दुपारी 3 वाजता जायभायवाडी येथे होणार असून हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची  मोठी गर्दी होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!