दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना

संत भगवानबाबा पालखी सोहळा मंगळवारी पाटोद्यात; संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना   

 

              पाटोदा/अमोल जोशी                          महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग यांच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी  दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाटोद्यातून शेकडो दिंड्या व हजारो भाविक पाटोदा शहरातून रवाना झाले असून शेवटचा भगवानगड येथून येणारा भगवान बाबा पालखी सोहळा पाटोदा येथे उद्या सकाळी दहा वाजता  शहरात दाखल होणार आहे. 

        शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य दिव्य स्वागत होईल या नंतर बस स्टँड , बाजारतळ मार्गे हा पालखी सोहळा भामेश्वर मंदिरात दाखल होऊन तिथे दर्शन सोहळा होणार आहे सर्व वारकऱ्यांची जेवणाची सोय कन्या शाळा नगरपंचायत जवळ येथे केलेली आहे भगवान बाबांच्या पादुका दर्शना साठी व स्वागतासाठी  तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक सकाळीच पाटोद्यात दाखल होतात, दुपारी हा सोहळा दीघोळ कडे प्रस्थान करणार आहे. आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातील हजारो दिंड्या पंढरपूर येथे येतात त्यापैकी पंढरपूरमध्ये येणाऱ्या मानाच्या नऊ दिंड्या असतात त्या दिंड्यांमध्ये पैठण येथून निघणारी संत एकनाथ महाराजांची तर संत ज्ञानेश्वराच्या जन्म गाव आपेगाव येथून येणारी ज्ञानेश्वर महाराजांची महाराजाची पालखी व भगवानगड येथून येणारी भगवान बाबाची पालखी या तीनही पालख्या पाटोदा शहरातून मार्गस्थ होतात. 


Click: विधानसभा लढवणारच- राजाभाऊ फड


या तीनही पालख्यांना पंढरपूर मध्ये मानाच्या असलेल्या नऊ पालख्या पैकी तीनही  पालख्याना वाखरी येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्यानंतर पंढरपूर मध्ये दाखल होण्याचे मान आहेत. या तीन मोठ्या पालख्यासह  शहरातून शेकडो दिंड्या व त्यातून हजारो वारकरी पंढरपूरसाठी रवाना होतात यावेळी पाटोदा शहरांमध्ये सात दिवस येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची जेवणाची निवासाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते .

Click:■ महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार!

          आषाढी साठी शेवटची पालखी ही भगवान बाबाची पाटोदा शहरातून जात असते या येणाऱ्या सर्व पालख्यांचे पाटोदा शहरात मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात स्वागत केले जाते यंदा हा स्वागत सोहळा डीजे बँड टाळ मृदंग तर स्वागतासाठी क्रेनने हार घालण्यात आले गेल्या आठ दिवसापासून पाटोदा शहर हे भक्तिमय वातावरणात दिसून येत आहे.      

पाण्यावर बैसुनी वाचली ज्ञानेश्वरी...... 

       राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा जन्म हा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील असून संपूर्ण जगभरात बाबांची ख्याती असून विहरीतील पाण्यावर पंचा टाकून बाबांनी ज्ञानेश्र्वरी वाचली होती, पाटोदा तालुका ही बाबांची जन्मभूमी असल्याने पाटोदा तालुक्यातील जवळपास सर्व गावातून बाबांचे भक्त पालखीच्या  दर्शनासाठी  व स्वागतासाठी  येतात व पाटोदा येथून अनेक वारकरी पालखी सोबत पंढरपूरकडे रवाना होतात.

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांचे पाटोदा हे जंक्शन....

 आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांचे पाटोदा हे जंक्शन झाले आहे खानदेश, जळगाव ,अमरावती,  सह मराठवाडा व महाराष्ट्रातील अनेक दिंडी  पाटोदा शहरातून पालखी मार्गाने पंढरपूर कडे रवाना होतात. मात्र पालखी मार्गाच्या अर्धवट रस्ता कामामुळे वारकऱ्यांचे पायी चालताना हाल होत आहेत.

गावोगावी स्वागत.... 

  पैठण ,आपेगाव, भगवानगड ,जळगाव ,अमरावती, येथून पंढरपूर साठी रवाना होणाऱ्या दिंड्यांची शेकडो वर्षाची परंपरा असून पाटोदा तालुक्यातून या सर्व दिंड्याचे मोठ्या प्रमाणात आदर ,स्वागत गावोगावी केले जाते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....