23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा

 श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा



गेवराई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती चे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री दिलीप बाबा घोगे,भा.शि.प्र.संस्था कार्यवाह डॉ.श्री.हेमंत वैद्य, डॉ.श्री.राधेश्याम झंवर,श्री.अनिल बोर्डे श्रीम.प्रणिता ताई हिटनाळीकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीम.सुषमा ताई मोरगांवकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

        मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत आजचा द्वितीय दिनाचा प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिलीप बाबा घोगे यांच्या हस्ते पार पडला.

         कार्यक्रमाचे पद्य गायन इयत्ता आठवी तील विद्यार्थिनीनी केले तर प्रास्ताविक श्रीम.वक्ते ताई यांनी केले तर अखंड भारत दिनाची माहिती श्री.घोलप सर यांनी विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडली.

         प्रमुख अतिथी दिलीप बाबा घोगे यांनी एकसंघ राहाणे काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन संगठीत राहण्याचा मंत्र विद्यार्थांना दिला अध्यक्षीय समारोप करत असतांना श्री.प्रमोद कुलकर्णी यांनी आपल्या भारतमातेच्या रक्षणार्थ सदैव आपण कटिबध्द राहण्याचे आवाहन केले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम.माने ताई यांनी केले तर श्रीम.वक्ते ताई यांनी सांगितलेल्या समरसता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?