दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा

 श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा



गेवराई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती चे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री दिलीप बाबा घोगे,भा.शि.प्र.संस्था कार्यवाह डॉ.श्री.हेमंत वैद्य, डॉ.श्री.राधेश्याम झंवर,श्री.अनिल बोर्डे श्रीम.प्रणिता ताई हिटनाळीकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीम.सुषमा ताई मोरगांवकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

        मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत आजचा द्वितीय दिनाचा प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिलीप बाबा घोगे यांच्या हस्ते पार पडला.

         कार्यक्रमाचे पद्य गायन इयत्ता आठवी तील विद्यार्थिनीनी केले तर प्रास्ताविक श्रीम.वक्ते ताई यांनी केले तर अखंड भारत दिनाची माहिती श्री.घोलप सर यांनी विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडली.

         प्रमुख अतिथी दिलीप बाबा घोगे यांनी एकसंघ राहाणे काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन संगठीत राहण्याचा मंत्र विद्यार्थांना दिला अध्यक्षीय समारोप करत असतांना श्री.प्रमोद कुलकर्णी यांनी आपल्या भारतमातेच्या रक्षणार्थ सदैव आपण कटिबध्द राहण्याचे आवाहन केले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम.माने ताई यांनी केले तर श्रीम.वक्ते ताई यांनी सांगितलेल्या समरसता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....