23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

श्रावणी वेदप्रचार सप्ताह

स्वर्ग व नरकाविषयी वेदांचा विशुद्ध दृष्टिकोन आचरणात आणावा !


श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य ज्ञानप्रकाशजी 


परळी वैजनाथ, दि.१५-

                          जगात स्वर्ग व नरक हे दोन्ही या भूतलावरच असून त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात परंपरागत भ्रामक व मिथ्या कल्पना पसरल्याने सर्वत्र  दुःखाचे वातावरण आहे.  स्वर्ग व नरकाविषयी वेदांचा विशुद्ध दृष्टीकोन आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुखी ठरते, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाश शास्त्री यांनी केले.

 

                  येथील आर्य समाजात कालपासून सुरू झालेल्या श्रावणी वेदप्रचार सप्ताहाच्या रात्रकालीन ज्ञानसत्रात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान स्वामी विद्यानंद सरस्वती हे होते. आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनात श्री शास्त्री म्हणाले की सध्या समाज अविद्या व अंधश्रद्धांनी ग्रासलेला आहे. स्वर्ग व नरकाच्या भ्रामक कल्पनामुळे समाजात दुःखाचे वातावरण पसरले आहे. ज्ञानपूर्वक सत्कर्मांनी सुखी होणे म्हणजे स्वर्ग तर अज्ञानपूर्वक दुष्कर्मांनी दुःखी होणे म्हणजेच नरक होय. म्हणूनच सुखविशेष स्वर्गाच्या प्राप्तीसाठी मानवाने वेदज्ञानाचा आश्रय घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

          आपल्या कुटुंबात सुख व शांतता कशी नांदावी, याविषयी आचार्य भर्तृहरी यांच्या श्लोकाच्या आधारे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी वेदप्रचारक पं. भूपेंद्रसिंह आर्य व पं. लेखराज शर्मा यांनी आपल्या मधुर भजनसंगीताच्या माध्यमाने व्यक्ती, कुटुंब समाज व देशाच्या उन्नतीसाठी सत्यज्ञानाचा आश्रय घेण्याचे आवाहन केले.    

         यावेळी  शतायुषी तपस्वी संन्यासी स्वामी सोमानंद सरस्वती, डॉ. ब्रह्ममुनिजी, श्रद्धानंद गुरुकुलाचे आचार्य श्री सत्येंद्रजी, संस्थेचे  अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया सचिव उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे, लक्ष्मण आर्य गुरुजी, डॉ. मधुसूदन काळे, जयपाल लाहोटी, प्रशांतकुमार शास्त्री, रमेश भंडारी, लिंबाजी कदम, गोवर्धन चाटे, डॉ. विश्वास भायेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?