23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती

 क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती



मुंबई दि. ६ ऑगस्ट

राज्याचे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख (भा प्र से) यांना सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे आदेश आज निर्गमित केले आहेत. पदोन्नती नंतर त्यांची नियुक्ती आहे त्याच पदावर श्रेणी उन्नत करून कायम ठेवण्यात आली आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे आणि यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणून सुद्धा काम त्यांनी पाहिले.

डॉ. राजेश देशमुख अतिशय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून परिचित असून वेगवेगळ्या पदावर काम करताना त्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे.

डॉ. राजेश देशमुख यांना यापूर्वी विविध पदावर काम करत असताना पी.एम. किसान, पी.एम. आवास योजना परिणामकारकरित्या राबवल्याबद्दल केंद्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मान सन्मानित करण्यात आले होते.

 तसेच पुणे जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती मुर्मु यांच्या हस्ते त्यांचा बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 

याशिवाय त्यांना स्वच्छ भारत अभियान व्यवस्थापन या क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?