इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



गेवराई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती चे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणून जयमंगल दादा जाधव,प्रमुख अतिथी म्हणून गेवराई शहरातील सर्व स्थापत्य अभियंता वर्ग सर्व श्री.संजय पंडित,सयाजी काळे,रामानंद स्वामी,निलेश खेत्रे,अक्षय शेटे,अक्षय करांडे, ह.भ.प.कैलास महाराज, स्थानिक समन्वय समिती उपाध्यक्ष डॉ.श्री.राधेश्याम झंवर,कार्यवाह श्री दत्ताजी पत्की,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री.अक्षय कुलकर्णी,श्री.नितीन डोळे श्री.अनिल बोर्डे श्री किशोर बोर्डे, डॉ.विजय सिकची श्री.सुदर्शन गुळजकर श्री.बाबासाहेब सांगुळे श्री.केशव पंडित,श्रीम.प्रणिता ताई हिटनाळीकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीम.सुषमा ताई मोरगांवकर माध्यमिक मुख्याध्यापक श्री.अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

        मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व  प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम जयमंगल दादा जाधव यांच्या हस्ते पार पडला.

         कार्यक्रमाचे पद्य गायन श्री गोले सर यांनी केले तर प्रास्ताविक श्रीम.माने ताई यांनी केले.

         प्रमुख अतिथी श्री संजय पंडित  यांनी शालेय वातावरण व शालेय शिस्त याबाबत समाधान व्यक्त केले व विद्यार्थांच्या उज्वल भवितव्या साठी ही संस्था नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगत मी देखील या संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगितले प्रमुख उपस्थिती जयमंगलदादा जाधव यांनी विद्यार्थ्यांनी योग, प्राणायाम,ध्यानधारणा यांच्या नियोजनातून स्वतःचा विकास करून घ्यावा असे प्रतिपादन केले. स्थानिक समन्वय समिती कार्यवाह दत्ताजी पत्की यांनी स्व विकास साधण्यासाठी व भारतमातेच्या विकासासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असावे सांगितले अध्यक्षीय समारोप करत असतांना श्री.प्रमोद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या  व योग प्राणायाम ध्यान धारणा या बरोबर पर्यावरचे संगोपन करण्यासाठी चे आवाहन केले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम.रामदासी ताई यांनी केले तर श्रीम.वक्ते ताई यांनी सांगितलेल्या समरसता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या