इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

ड्रोनमुळे नागरिकांत भिती ; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी

 अज्ञात ड्रोनच्या घिरटयांचा पोलीस प्रशासनाने तातडीने शोध घ्यावा 


आ. पंकजाताई मुंडे यांनी उप मुख्यमंत्र्यांसह एसपींकडे केली पत्राद्वारे मागणी


ड्रोनमुळे नागरिकांत भिती ; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी


बीड।दिनांक २३।

गेल्या काही दिवसांपासून  अहमदनगर व बीड जिल्ह्यात ड्रोनच्या घिरट्याने ग्रामीण भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    चोरीच्या भीतीने नागरिक रात्र जागून काढत आहेत. हा प्रकार नेमका काय आहे? याचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाला संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही जिल्ह्याच्या एसपींकडे एका पत्राद्वारे केली आहे.


   मागील एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, गेवराई, वडवणी, धारूर यासह अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोन च्या माध्यमातून चोरीसाठीची रेकी करत असल्याची अफवा नागरिकांमध्ये आहे, त्यामूळे नागरिकांची झोप उडाली असून ग्रामस्थांमध्ये दहशत आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   दरम्यान, हया सर्व प्रकारात आपण स्वतः गांभीर्याने लक्ष घालून हा प्रकार नेमका काय आहे? याचा शोध घ्यावा आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भिती पोलीस प्रशासनाकडून दूर करावी तसेच सध्या दोन्ही जिल्हयातील ग्रामीण भागात रात्रीच्या चोऱ्या व दरोडयांचे प्रमाण वाढलेले आहे यासाठी रात्रीच्या गस्त घालणारे पोलीस पथक तयार करुन रात्रीची गस्त वाढवावी तसेच  असे प्रकार करणारांविरूध्द कठोर कारवाई करावी आणि नागरीकांनी भयभीत होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य उपाययोजना कराव्यात अशी विनंती आ. पंकजाताई मुंडे पत्राद्वारे केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या