23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

लातूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

 विधानसभा निवडणुकीत परळीची जागा  काँग्रेसला सुटणार व निवडणूक लढवणार- ॲड अनील मुंडे 



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत लातूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांची आग्रही मागणी 

परळी वैजनाथ दि ११ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून यापूर्वीही काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवीत काँग्रेसच्या उमेदवाराने मोठे मताधिक्य मिळवले आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून परळीची जागा काँग्रेसला सुटणार व आपणच निवडणूक लढवणार अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲड अनिल मुंडे यांनी दिली.

काल राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथाला,  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, अमित देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आढावा घेतला. सदर बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने वर्धा लोकसभा मतदारसंघ तडजोडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील परळी, बीड आणि गेवराई मतदार संघाची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲड अनिल मुंडे बोलताना म्हणाली की, परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षाने या ठिकाणच्या निवडणुका लढवल्या त्या त्या वेळेस काँग्रेसच्या उमेदवाराने ६० ते ७० हजार मतदान घेतले आहे. या अगोदर सन २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा सोडण्यात आली नव्हती मात्र यंदा काँग्रेसला पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघासह वरील प्रमाणे जागा काँग्रेसला सोडण्यात याव्यात. 

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने जर आपणास उमेदवारी दिली तर आपण परळी तालुक्यातील सिंचन, रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी प्रामाणिकपणाने काम करू असे सांगून ॲड अनिल मुंडे म्हणाले की, आपण परळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष असताना सन २०११-१२ दरम्यान परळी तालुक्यातील नागापूर येथे वाण प्रकल्पावर डावा व उजवा कालवा असून त्यावरी वितरिका (चाऱ्या) आहेत परंतु सर्व कालवे (चाऱ्या) ह्या मोडल्या असल्याने त्यावेळी आपण तात्कालीन राज्यमंत्री मा राजेंद्र मुळक यांच्याकडे कालवा व चाऱ्या दुरुस्तीसाठी आढावा बैठक घेतली होती सदर आढावा बैठकीत मा राज्यमंत्री महोदयांनी वाण प्रकल्पावरील कालवा व चाऱ्या दुरुस्तीसाठी जवळपास तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश दिले होते मात्र २०१४ दरम्यान राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर या कामास गती मिळाली नाही. वाण प्रकल्पाची पाणीसाठाक्षमता १९.७०७१ दलघमी असुन यातील कांही पाणीसाठा शेतीसाठी राखीव ठेवण्यात आला होता मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी सर्वच पाणीसाठा शेती सोडून आरक्षित केले आहे. मात्र आगामी काळात हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अग्रक्रमाने प्रयत्न करू असेही ॲड अनिल मुंडे म्हणाले.

आपण २००९-१० दरम्यान परळी वकील संघाचे अध्यक्ष असताना तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री यांच्याकडे त्यांच्या दालनात बैठक लावून परळी न्यायालयासाठी पाटबंधारे खात्याची इमारत व दोन एकर जागा मिळवून दिली होती असे सांगून ॲड अनिल मुंडे म्हणाले की, परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सन २००८ ते २०१२ दरम्यान तालुकास्तरीय कृषी प्रदर्शने आयोजित केलेली आहेत. त्याचबरोबर परळी शहरवासियांच्या रेल्वे प्रश्नाबरोबरच मतदार संघातील विविध ज्वलंत कामासाठी आपण आंदोलने, उपोषणे केलेली असून पक्षाने जर आपणास उमेदवारी दिलीच तर आपण नक्कीच निवडणूक जिंकू ही 'काळ्या दगडावरची पांढरी रेघ' आहे असेही ॲड अनिल मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?