23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

निश्चितच यशस्वी व्हाल, अभ्यासाचे कष्ट बनवतात श्रेष्ठ- दशरथ सिरसाठ

 तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच यशस्वी व्हाल, अभ्यासाचे कष्ट बनवतात श्रेष्ठ- दशरथ सिरसाठ


परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

     तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच यशस्वी व्हाल असे प्रतिपादन दशरथ सिरसाट यांनी केले. महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य व जीवनविद्या प्रबोधनीचे सदस्य दशरथ सिरसाठ (मुंबई ) बोलत होते 

    येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शुक्रवारी (दि.३०) विशेष विद्यार्थी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, जीवन विद्या मिशनचे दशरथ सिरसाठ, डॉ.किशोर संख्ये, रमाकांत निर्मळे, श्री शेवलकर, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना श्री सिरसाठ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मनात विचार पक्का केला की , अंतर्मन त्या दिशेने कार्य करते. तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार आपल्या अंतर्मनात पेरल्यानंतर स्वराज्य निर्माण झाले.

जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार मिळत असतो अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. डॉ.किशोर संख्ये यांनी आपली मुलगी आयएएस डॉ कश्मीरा संख्ये हिच्या यशाची प्रेरणादायी कहाणी सांगितली आणि माणसाने ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे किती गरजेचे आहे. या अनुषंगाने मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करत असताना संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी अशा प्रबोधनपर कार्यक्रमाची पुन्हा पुन्हा विद्यार्थिनींना गरज आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण नव्हाडे यांनी तर आभारप्रकटन प्रा.प्रवीण फुटके यांनी केले .या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.ह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?