इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

थाईलेसिमिया आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर परिवाराच्या चेहेऱ्यावर हास्य फुलविले

 76 व्या वेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोलीस कर्मचारी दत्तात्रय गायकवाड


थाईलेसिमिया आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर परिवाराच्या चेहेऱ्यावर हास्य फुलविले


परळी/प्रतिनिधी:


सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची उत्तम उदाहरण असलेल्या परळी वैजनाथ येथील रहिवासी व नांदेड येथे कार्यरत असलेल्या दत्तात्रय गायकवाड या पोलीस कर्मचार्‍याने एक  आदर्श निर्माण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. थाईलेसिमिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर या बालकास  परळीतील रहिवाशी असलेले पोलीस कर्मचारी, श्री. दत्तात्रय गायकवाड यांनी रक्तदान करून समाजासाठी एक प्रेरणादायक संदेश दिला आहे.सामाजिक कार्यात आपल्या सक्रिय सहभागामुळे श्री. दत्तात्रय गायकवाड यांचे नाव एक आदर्श म्हणून घेतले जाते. त्यांनी आपल्या 76 व्या रक्तदानाने अनेकांची जीवनरक्षणात मदत केली आहे, आणि त्यांच्या या कार्यामुळे रक्ताच्या अभावी होणाऱ्या अनेकांची अडचण दूर झाली आहे.त्यांच्या रक्तदानाच्या या अविरत कार्यामुळे अनेक रुग्णांची जीवंत राहण्याची आशा वाढली आहे. श्री. गायकवाड यांचे कार्य समाजात रक्तदानाची गरज आणि महत्व यावर जागरूकता निर्माण करत आहे. त्यांची निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी सर्वांना प्रेरणादायक ठरली आहे.त्यांचे रक्तदानाचे अभियान अनेक रक्तदान शिबिरे आयोजित करून, रक्ताच्या अभावामुळे होणाऱ्या संकटांवर मात करण्याचा संदेश देत आहे. श्री. गायकवाड यांच्या या कार्यामुळे समाजातील अनेक व्यक्ती रक्तदान करण्यास प्रेरित झाले आहेत  श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रूप तर्फे हे कार्य केले जाते. गरजवंत थायलेसेमिया पीडित बालकांना या ग्रूप तर्फे आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचा आदर्श उदाहरण बनले आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!