23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिण योजनेबाबत भगिनींना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी:- अनिल बोर्डे

 मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिण योजनेबाबत भगिनींना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी - अनिल बोर्डे    


  

   गेवराई :- मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनी गेवराई येथील बँकेत व पोस्ट कार्यालयात जातात त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती बीड जिल्ह्यातील नामांकित दैनिक दिव्य लोकप्रभा च्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे त्याची दखल बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी त्याची दखल घेऊन होणाऱ्या त्रासाची माहिती माननीय पोस्ट मास्टर,  मुख्य व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गेवराई येथील दोन्ही शाखेस देऊन त्यांना या त्रासाची माहिती प्रत्यक्ष देऊन काउंटर वाढविण्याची मागणी केलेली आहे काउंटर वाढविण्याची मागणी मान्य केलेली आहे त्याची प्रत तहसीलदार गेवराई यांना दिलेली आहे.               

   मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभ घेण्यासाठी महिला भगिनी गेवराई येथील आपल्या शाखेत केवायसी आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी येत आहेत परंतु सदरील भगिनींना आपल्या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे भगिनींना काउंटरवर अन्न पाण्याविना दिवसभर थांबावे लागत आहे. त्यासाठी आपल्या बँकेने लाडक्या बहिणीचे हाल थांबविण्यासाठी जादा काउंटर उघडणे आवश्यक आहे याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.        

  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलाच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. परंतु बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असल्याशिवाय आणि बँकेची केवायसी पूर्ण असल्याशिवाय पैसे जमा होत नाहीत. सकाळी बँकेत नऊ वाजल्यापासून भगिनींना आधार लिंक व केवायसी करण्यासाठी एकच काउंटर असल्यामुळे दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीचे हाल होत आहेत. तसेच काही महिलांना उद्धटपणाची वागणूक दिल्याचे कळते. अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड शाखेकडून करण्यात आलेली आहे.                         तरी वरील प्रकरणी योग्य ती कार्यवाही मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थ्यांना त्रास होणार नाही याबाबत कटाक्षाने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे. गेवराई नगरपरिषद माजी उपाध्यक्ष विश्वास चपळवाकर, नगरपरिषद माजी सदस्य राजेंद्र सुतार, प्राध्यापक भानुदास फलके, वल्लभ  तौर आदींनी केलेली आहे. या याप्रकरणी काही तक्रार असल्यास महिला भगिनींनी ग्राहक मार्गदर्शन केंद्र गेवराई यांच्याकडे भ्रमणध्वरीद्वारे तक्रार करावी त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल. भ्रमणध्वनी क्रमांक 94 21 34 30 60.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?