मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

शेती पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीस विहित मर्यादेत कळवावी - मुंडेंचे आवाहन

 पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश


शेती पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीस विहित मर्यादेत कळवावी - मुंडेंचे आवाहन


बीड जिल्ह्यातील नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, रात्रीतून काही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता - धनंजय मुंडे यांचे जनतेला आवाहन


मुंबई (दि. 01) - संपूर्ण बीड जिल्ह्यात 31 ऑगस्ट पासून ते आतापर्यंत सातत्याने सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याची बातमी जरी आनंददायक असली, तरी सततच्या पावसाने अतिवृष्टी व काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे खरीप हंगामातील शेती पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काही महसूल मंडळांमध्ये 24 तासांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला असून, राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वीच काढलेल्या आदेशाला अनुसरून महसूल व कृषी विभागाने पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांच्या तसेच घरांच्या पडझडीच्या आदी नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व शेती पिकांच्या 33% च्या मर्यादेपेक्षा जास्त नुकसानीचे अहवाल राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीसह तातडीने पाठवावेत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 


बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग घेतला असून आपल्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार विमा कंपनीला देखील निर्धारित वेळेत कळवावी, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचे ही संरक्षण लागू राहील, असेही आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


दरम्यान सध्या जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून त्याउपर नद्यांमधून व नाल्यांमधून पाणी वाहत आहे. पावसाचा जोर आणखी पुढील 24 तास जर इतकाच प्रखर राहिला तर काही नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात व त्यामुळे नदीकाठच्या गावांना किंवा नदीकाठच्या शहर वस्त्यांना देखील पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.  त्यामुळे विशेष करून जलाशय व नदीकाठच्या गावच्या नागरिकांनी सतर्क रहावे या आवाहनासह नदीच्या पूर नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात यावे अशा पद्धतीच्या सूचना देखील धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....