23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत दिले ब्राह्मण समाजाला आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

 दिलासादायक:अमृत योजना कायम ठेवून ब्राह्मण समाजासाठी लवकरच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ होणार !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत दिले ब्राह्मण समाजाला आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

 मुंबई  प्रतिनिधी....

              गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी विविध स्तरातून सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे. राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संदर्भाने ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाची विशेष बैठक घेऊन चर्चा केली. अमृत योजना कायम ठेवून येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिलीआहे. गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक होणार असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

         उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आज ब्राह्मण समाज शिष्टमंडळाशी विशेष बैठक घेऊन चर्चा केली. परळी येथे झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेतील मुख्य ठराव म्हणून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी एकजुटीने मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्यात समाज बांधवांच्या वतीने विविध स्तरावर आंदोलने, निवेदने व आपापल्या स्तरावरून शासन दरबारी पाठपुरावा केला गेला. परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारच्या वतीने सकल ब्राह्मण समाजाला याबाबत समन्वयक म्हणून आपण भूमिका पार पाडू असा शब्द दिला होता. त्या अनुषंगाने सरकार दरबारी याबाबतचा पाठपुरावा सुरू होता. ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सातत्याने सरकार दरबारी याबाबत पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी समाज बांधव उपोषणाला बसले होते. त्यावेळीही वेळोवेळीही ना.धनंजय मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत ब्राह्मण समाजाला आश्वासित केले होते. तीच भूमिका पार पाडत सरकारच्या स्तरावर हा प्रश्न सोडवण्यासाठीही धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाज शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ची बैठक ठरवण्यात आली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. अमृत योजना कायम ठेवून लवकरात लवकर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या शिष्टमंडळात ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक  बाजीराव भैया धर्माधिकारी,परळी वैजनाथ, विश्वजीत देशपांडे,पुणे,मनोज जोशी, लातूर, शैलेश कुलकर्णी, अंबेजोगाई, अजिंक्य पांडव, बीड , सचिन वाडे पाटील, संभाजीनगर,महेश दोरवट पाटील, संभाजीनगर,काकासाहेब कुलकर्णी, सोलापूर, संजय कुलकर्णी-सुपेकर, गंगाखेड,रमण उपाध्याय, जालना,डॉ. संजीवनी पांडे, मुंबई, विजया कुलकर्णी, संभाजीनगर सूर्यकांत देशमुख, बार्शी, शशांक खेर, डोंबिवली, आलोक चौधरी- सेलू, सौ. धनश्रीताई उत्पात, पंढरपूर आदीसह ब्राह्मण समाजातील प्रमुख समन्वयक  पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?