इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

श्री चिंतेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित कार्यक्रम संपन्न

 श्री चिंतेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित कार्यक्रम संपन्न


गेवराई (प्रतिनिधी ):भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        शालेय वाहतूक करणारे ज्येष्ठ चालक श्री महेशजी लाड यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्था.स.स.अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी,प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष डॉ श्री.राधेश्याम झंवर कार्यवाह श्री दत्तात्रय पत्की,श्री अनिल बोर्डे,श्रीम.मोरगांवकर ताई,श्री अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्रीम.मोरगांवकर ताई  यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.प्रमुख उपस्थित श्री महेश लाड यांनी विद्यालयाच्या प्रगती साठी आम्ही सर्व वाहन चालक बंधू सदैव तत्पर असू अश्या भावना व्यक्त केल्या.

        अध्यक्षीय समारोपात श्री प्रमोद कुलकर्णी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देत मराठवाडा विकासात स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या बाबत काम करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.प्रसंगी वाहन चालक सर्व श्री.प्रकाश 

चव्हाण,संजय चौधरी,महेंद्र निसर्गंध उपस्थित होते.कार्यक्रमाचे 

 सूत्रसंचलन श्रीम.मोटे ताई यांनी केले तर श्री घोलप सर यांनी समरसता मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या