इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारकडे ब्राह्मण समाजाच्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन सादर !


सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        राज्यातील ब्राह्मण समाजासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व प्राप्त परिस्थितीनुसार आवश्यक ठरणाऱ्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सादर करण्यात आले. ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असुन सर्व मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.

      ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भाने सरकारच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला आश्वासित करून अमृत संस्था कायम ठेवून लवकरच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. त्याचप्रमाणे यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारला ब्राह्मण समाजाच्या सात प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या. दिलेल्या निवेदनात अमृतमधून ब्राह्मण समाज बाहेर न पडता भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण व्हावे ,राज्यात स्वतंत्र EWS मंत्रालय स्थापन व्हावे , ब्राह्मण समाजासाठी विशेष संरक्षण कायदा निर्माण व्हावा , ब्राह्मण समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना पुणे,ठाणे, संभाजीनगर,नागपूर नाशिक, कोल्हापूर, लातूर, अंबेजोगाई, नांदेड, अहमदनगर सह विविध ठिकाणी वसतिगृह उभारणे,शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करीत सुशोभिकारणसाठी निधी उपलब्ध करुन देणे ,बाजीप्रभु देशपांडे यांचे घोडखिंड येथे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करणे, राज्यातील पुरोहितांना व वैदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मानधन सुरु करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

         या मागण्यांबाबत चर्चा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाच्या या सर्व मागण्या न्याय मागण्या असुन सरकार या सर्व मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक व कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात एकेक करून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. असे आश्वासन त्यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती ब्राह्मण मुख्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या