23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारकडे ब्राह्मण समाजाच्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन सादर !


सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        राज्यातील ब्राह्मण समाजासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व प्राप्त परिस्थितीनुसार आवश्यक ठरणाऱ्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सादर करण्यात आले. ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असुन सर्व मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.

      ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भाने सरकारच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला आश्वासित करून अमृत संस्था कायम ठेवून लवकरच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. त्याचप्रमाणे यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारला ब्राह्मण समाजाच्या सात प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या. दिलेल्या निवेदनात अमृतमधून ब्राह्मण समाज बाहेर न पडता भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण व्हावे ,राज्यात स्वतंत्र EWS मंत्रालय स्थापन व्हावे , ब्राह्मण समाजासाठी विशेष संरक्षण कायदा निर्माण व्हावा , ब्राह्मण समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना पुणे,ठाणे, संभाजीनगर,नागपूर नाशिक, कोल्हापूर, लातूर, अंबेजोगाई, नांदेड, अहमदनगर सह विविध ठिकाणी वसतिगृह उभारणे,शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करीत सुशोभिकारणसाठी निधी उपलब्ध करुन देणे ,बाजीप्रभु देशपांडे यांचे घोडखिंड येथे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करणे, राज्यातील पुरोहितांना व वैदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मानधन सुरु करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

         या मागण्यांबाबत चर्चा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाच्या या सर्व मागण्या न्याय मागण्या असुन सरकार या सर्व मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक व कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात एकेक करून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. असे आश्वासन त्यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती ब्राह्मण मुख्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?