इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!

 अतिक्रमणांचा विळखा, न.प.चा अंधाधुंद कारभार व फसलेली भुयारी गटार योजना यामुळे परळीत घुसले पाणी : सखोल चौकशी करा- ॲड. जीवनराव देशमुख


परळी वै., प्रतिनिधी...

       सरस्वती नदीवरील वाढलेली अतिक्रमणे व नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेली अर्धवट व फसलेली भुयारी गटार योजना यामुळे सर्वत्र पाणी तुंबून बसत आहे.रस्ते खोदलेले,नाल्या अर्धवट,गटारांची कामे पूर्ण नाहीत यामुळेच परळीकरांना अनेक वर्षापासून फसव्या विकासाच्या नावाखाली त्रासून टाकलेले आहे.नगर परिषदेचा भोंगळ कारभार व कोट्यावधी शासकीय निधी गिळून टाकण्यासाठी राबवलेली व फसलेली भुयारी गटार योजना याची सखोल चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी केली आहे.

       याबाबत मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासून परळी शहराच्या जुन्या भावभागातून वाहत असणाऱ्या सरस्वती नदीचे पात्र कमी कमी होत गेले आहे. या पात्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे व  नदीपात्रात झालेल्या बांधकामामुळे नदीपात्र कमी झाले असून या नदीला नाल्याचे रूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत नसल्याने गेल्या सात आठ वर्षात याची जाणीव झालेली नव्हती मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि सरस्वती नदीने रौद्ररूप धारण केले व नागरिक वस्त्यांमध्ये हे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली.तसेच परळी नगर पालिकेला भुयारी गटारमधून पाण्याचे शुध्दीकरण करुन वाया जाणारे पाणी प्रक्रिया करुन वापरण्यासाठी भुयारी गटार योजनेसाठी 150 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. या निधीचा वापर हा गैरमार्गाने झालेला आहे.अद्याप भुयारी गटार योजनेमुळे परळी शहरातील पुर्ण रस्ते हे फोडलेले असून कोठेही भुयारी गटारातून पाणी जात नसल्याची स्थिती आहे याची सखोल चौकशी करावी.

     सरस्वती नदी ही शहरातील नागरी वस्त्यांमधून जाते. या नदीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. नगरपालिकेच्या वतीने सातत्याने या नदी पात्राची स्वच्छता करणे, त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी यातील गाळ काढून घेणे ही कामे होणे गरजेचे असते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सरस्वती नदीला आठ वर्षांत पहिलाच पूर आल्यानंतर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरून दाणादाण उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.परळी नगर परिषदेच्या अंदाधुंद कारभाराची व विविध विकासकामांना देण्यात आलेल्या शासकीय निधीचा वापर या  प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....