इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा

 कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा


डॉ.अजित नवले, डॉ.डी.एल कराड यांची असणार उपस्थिती


परळी / प्रतिनिधी

       सततचे अस्मानी आणि सुलतानी संकट आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी करत तात्काळ पीक विमा वितरण करावा यासह इतर मागण्याला घेत अखिल भारतीय किसान सभा बीड कडून महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार,जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला असून सततचे अस्मानी आणि सुलतानी संकटात मरण यातना सहन करत आहे.शेती विरोधी धोरणातून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावी,सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची करण्यासाठी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश अंमलबजावणी करावी,पिकविमा पारदर्शक बनवून सर्व प्रलंबित विमा मिळावा,उत्पादन खर्चावर आधारित कापसाला १०००० व सोयाबीनला ७००० हजार रु. हमीभाव देण्यात यावा,राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशातून प्रभावीपणे नुकसान भरपाई देण्यात यावी, महाडीबीटी अंतर्गत वर्षांनुवर्ष प्रलंबित असणारे हक्काचे अनुदान मिळावे यांसाठी मागील पाच दशकापेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक उत्कर्षासाठी लढत असलेल्या अखिल भारतीय किसान सभा बीड च्या वतीने कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या या 16 व्या स्मृतीदिनानिमित्त माजलगाव तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शेती, शेतकरी वर्गाच्या न्याय हक्काच्या प्रश्नावर या मेळाव्यास किसान सभेचे राज्य सचिव,शेतकरी नेते डॉ.अजित नवले तर शेतमजुरांच्या प्रश्नावर सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड हे मार्गदर्शन करणार आहेत.या शेतकरी मेळाव्यास शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव चे सदस्य ताठ नित्रुग गावचे सरपंच कॉ.दत्ता डाके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या