दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा

 कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा


डॉ.अजित नवले, डॉ.डी.एल कराड यांची असणार उपस्थिती


परळी / प्रतिनिधी

       सततचे अस्मानी आणि सुलतानी संकट आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी करत तात्काळ पीक विमा वितरण करावा यासह इतर मागण्याला घेत अखिल भारतीय किसान सभा बीड कडून महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार,जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला असून सततचे अस्मानी आणि सुलतानी संकटात मरण यातना सहन करत आहे.शेती विरोधी धोरणातून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावी,सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची करण्यासाठी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश अंमलबजावणी करावी,पिकविमा पारदर्शक बनवून सर्व प्रलंबित विमा मिळावा,उत्पादन खर्चावर आधारित कापसाला १०००० व सोयाबीनला ७००० हजार रु. हमीभाव देण्यात यावा,राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशातून प्रभावीपणे नुकसान भरपाई देण्यात यावी, महाडीबीटी अंतर्गत वर्षांनुवर्ष प्रलंबित असणारे हक्काचे अनुदान मिळावे यांसाठी मागील पाच दशकापेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक उत्कर्षासाठी लढत असलेल्या अखिल भारतीय किसान सभा बीड च्या वतीने कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या या 16 व्या स्मृतीदिनानिमित्त माजलगाव तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शेती, शेतकरी वर्गाच्या न्याय हक्काच्या प्रश्नावर या मेळाव्यास किसान सभेचे राज्य सचिव,शेतकरी नेते डॉ.अजित नवले तर शेतमजुरांच्या प्रश्नावर सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड हे मार्गदर्शन करणार आहेत.या शेतकरी मेळाव्यास शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव चे सदस्य ताठ नित्रुग गावचे सरपंच कॉ.दत्ता डाके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....