अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

युवकांनी मजबुत मनःस्थितीने सकारात्मक जीवन जगावे - प्रा . डॉ . माधव रोडे

 युवकांनी मजबुत मनःस्थितीने सकारात्मक जीवन जगावे - प्रा . डॉ . माधव रोडे



मानवत :दि .24/09/2024 .रोजी के .के .एम .महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ कॉलेज,  परळी येथील भौतीकशास्त्र विषयाचे डॉ .माधव रोडे यांचे व्याख्यान आयोजित  करण्यात आले होते . यावेळी प्रा .माधव रोडे  म्हणाले तरूण युवक राष्ट्राचा प्राण आहेत, त्यांनी सकारात्मक  सृष्टी, दृष्टी, वृत्तीतून आपली मन: स्थिती मजबुत करून परिस्थिती बदलावी . युवकांनी नींद, अहम्, वहम् यातून लवकर जागे होऊन स्वतःतील बलस्थाने ओळखावी, मोठं व्हायला ओळख नाही, माणसाचे मन जिंकावी लागतात, माणुसकी जपावी लागते, आई जन्नत असते  तर बाप साया हे लक्षात ठेवावे . पर्यावरणसह मानवी मुल्यांचं संवर्धन करावे . या

       आधुनिक युगामध्ये आधुनिक साधनांचा वाढता वापर यामुळे मानवी मूल्यांचे हनन होत आहे .त्या कारणामुळे अशा साधनांचा वापर मर्यादित करावा असा संदेश दिला .आधुनिक साधनांमुळे मानवी जीवनाच्या जिवंतपणाचा ऱ्हास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . प्रा . माधव रोडे त्यांनी आपल्या विनोदी शैलीतून व  इतिहासातील महापुरुषाचा संदर्भ देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना आदर्श मूल्याचे महत्त्व पोवाडाच्या साह्याने विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे सादर केले .  अभिनय व पोवाडयाच्या साह्याने सहज सोप्या व विनोदी भाषेत प्रबोधन पर बहुमोल असे मानवी मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के के एम कॉलेज मानवत चे प्राचार्य डॉ . भास्कर मुंडे प्रमुख अतिथी डॉ . मिलिंद सोनकांबळे (महिला महाविद्यालय परळी ) कॉलेजचे उपप्राचार्य डॉ . किशोर हुगे रा. से यो चे कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष शिंदे उपस्थित होते,कार्यक्रमाधिकारी डॉ .सुनिता कुकडे  यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. तर  डॉ . सत्यनारायण राठी यांनी आभार मानले.  कार्यक्रम यरास्वी करण्यासाठी मूल्य समितीचे प्रमुख डॉ . पंडीत लांडगे ,प्रा.भागवत मोरे , प्रा. विनायक चोपडे ,श्रीमती डॉ सारीका सावंत , श्रीमती शारदा कच्छवे यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?