इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती - डॉ शशिकांत पट्टेकर

 पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था  उद्ध्वस्त झाली असती -  डॉ शशिकांत पट्टेकर


परळी/ प्रतिनिधी 

पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी अभ्यासक डॉ शशिकांत पट्टेकर यांनी स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी आणि फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सम्राट अशोक सभागृहात प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला थर्मल कॉलनी येथे 'पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२) : 'गाभा आणि वर्तमान स्वरूप' किंवा पुणे कराराचा धिक्कार वारंवार का करावा ? या विषयावर विशेष साप्ताहिक अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी बोलताना केले.  


उद्घाटक परळी औष्णिक विद्युत केंद्रांचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड यांनी केले. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे बी. एल. वडमारे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर, अँड कपिल चिंडालिया, लक्ष्मण वैराळ यांचीही उपस्थिती होती. 


पुणे कराराला ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. अनुसूचित जाती (पूर्वश्रमीचे अस्पृश्य) व अनुसूचित जमाती (पूर्वाश्रमीचे आदिवासी) यांच्यावर हा पुणे करार लादून, त्यांच्यामध्ये व्यवस्थेचे चमचे, दलाल निर्माण केले तसेच पुणे करारामुळे SC/ST ची अस्पृश्यता आजही बरकरार राहिली आहे. पुणे करार अप्रत्यक्षरित्या ओबीसी समुदायाशी लागू आहे. कार्यक्रमास उपकार्यकारी अभियंता संदीप गायकवाड, विशाल थोरात, श्याम इंगळे, अतिरिक्त कार्यकारी अधियंता निखिल मेश्राम, संयुक्त उत्सव समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र रोडे, नगरसेवक केशव गायकवाड, महादेव मस्के, शिवाजी बनसोडे, ज्ञानोबा मस्के, निलावाड सर, कनिष्क कलासरे , चेअरमन निशांत साळवे, प्रशांत मस्के, महेश मुंडे, पत्रकार रानबा गायकवाड, संपादक नितीन ढाकणे, प्रशांत कदम, आकाश देवरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे तर उपस्थितांचे आभार सचिन राऊत यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!