इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती - डॉ शशिकांत पट्टेकर

 पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था  उद्ध्वस्त झाली असती -  डॉ शशिकांत पट्टेकर


परळी/ प्रतिनिधी 

पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी अभ्यासक डॉ शशिकांत पट्टेकर यांनी स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी आणि फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सम्राट अशोक सभागृहात प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला थर्मल कॉलनी येथे 'पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२) : 'गाभा आणि वर्तमान स्वरूप' किंवा पुणे कराराचा धिक्कार वारंवार का करावा ? या विषयावर विशेष साप्ताहिक अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी बोलताना केले.  


उद्घाटक परळी औष्णिक विद्युत केंद्रांचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड यांनी केले. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे बी. एल. वडमारे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर, अँड कपिल चिंडालिया, लक्ष्मण वैराळ यांचीही उपस्थिती होती. 


पुणे कराराला ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. अनुसूचित जाती (पूर्वश्रमीचे अस्पृश्य) व अनुसूचित जमाती (पूर्वाश्रमीचे आदिवासी) यांच्यावर हा पुणे करार लादून, त्यांच्यामध्ये व्यवस्थेचे चमचे, दलाल निर्माण केले तसेच पुणे करारामुळे SC/ST ची अस्पृश्यता आजही बरकरार राहिली आहे. पुणे करार अप्रत्यक्षरित्या ओबीसी समुदायाशी लागू आहे. कार्यक्रमास उपकार्यकारी अभियंता संदीप गायकवाड, विशाल थोरात, श्याम इंगळे, अतिरिक्त कार्यकारी अधियंता निखिल मेश्राम, संयुक्त उत्सव समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र रोडे, नगरसेवक केशव गायकवाड, महादेव मस्के, शिवाजी बनसोडे, ज्ञानोबा मस्के, निलावाड सर, कनिष्क कलासरे , चेअरमन निशांत साळवे, प्रशांत मस्के, महेश मुंडे, पत्रकार रानबा गायकवाड, संपादक नितीन ढाकणे, प्रशांत कदम, आकाश देवरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे तर उपस्थितांचे आभार सचिन राऊत यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या