इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना

 अंबड बस-ट्रक अपघाताची घटना वेदनादायी - धनंजय मुंडे

जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना


परळी वैजनाथ(दि. 20) - गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अंबड जवळ संत्र्याच्या ट्रकने दिलेल्या धडकेत एसटी बस मधील सहा तर ट्रक मधील दोन अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या भीषण अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 


याच अपघातात आपला जुना सहकारी, बसचालक बंडू बारगजे यांचे दुःखद निधन झाले असून, त्याबद्दलही धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.


गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या एसटी बसला सकाळी नऊच्या सुमारास अंबड जवळ एका संत्र्याच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसचे चालक वाहक व अन्य चार प्रवासी तर ट्रकचा चालक व क्लीनर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 15 ते 20 जण जखमी असून यापैकी नऊ जणांना प्रथमोपचार करून जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जणाची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. 


तर किरकोळ जखमी असलेल्या उर्वरित प्रवाशांना अंबड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनाकडून अपघाताची माहिती घेऊन जखमींवर योग्य उपचार केले जावेत, याबाबत जालना जिल्हा प्रशासनास आवश्यक सूचना दूरध्वनीवरून केल्या आहेत. 


हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून मयत प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी प्रवाशांना देखील योग्य उपचार मिळून त्यांना लवकरात लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना करतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!