23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना

 अंबड बस-ट्रक अपघाताची घटना वेदनादायी - धनंजय मुंडे

जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना


परळी वैजनाथ(दि. 20) - गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अंबड जवळ संत्र्याच्या ट्रकने दिलेल्या धडकेत एसटी बस मधील सहा तर ट्रक मधील दोन अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या भीषण अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 


याच अपघातात आपला जुना सहकारी, बसचालक बंडू बारगजे यांचे दुःखद निधन झाले असून, त्याबद्दलही धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.


गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या एसटी बसला सकाळी नऊच्या सुमारास अंबड जवळ एका संत्र्याच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसचे चालक वाहक व अन्य चार प्रवासी तर ट्रकचा चालक व क्लीनर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 15 ते 20 जण जखमी असून यापैकी नऊ जणांना प्रथमोपचार करून जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जणाची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. 


तर किरकोळ जखमी असलेल्या उर्वरित प्रवाशांना अंबड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनाकडून अपघाताची माहिती घेऊन जखमींवर योग्य उपचार केले जावेत, याबाबत जालना जिल्हा प्रशासनास आवश्यक सूचना दूरध्वनीवरून केल्या आहेत. 


हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून मयत प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी प्रवाशांना देखील योग्य उपचार मिळून त्यांना लवकरात लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना करतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?