इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती -प्रा. डॉ. विनोद जगतकर

 हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती -प्रा. डॉ. विनोद जगतकर


 परळी, प्रतिनिधी...जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 व्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ विनोद जगतकर यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण होती असे मत प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. ए आर.चव्हाण ,प्रमुख वक्ते कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील   इतिहास विभाग प्रमुख, डॉ. विनोद जगतकर,विद्या परिषद सदस्य व स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास संशोधन केंद्राचे सदस्य तथा प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. पी एल कराड उपप्राचार्य प्रा डी के आंधळे,प्रा.हरीश मुंडे, IQAC चे समन्वयक डॉ व्ही जे चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्याचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के.शेप यांनी केला. त्यात त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजाम राजवटीने केलेल्या अन्याय अत्याचार विषयी थोडक्यात माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक डॉ जगतकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांचा सहभाग या विषयावर बोलताना सांगितले की,हैदराबाद संस्थानात स्त्रियांचे स्थान अतिशय हीन दर्जाचे होते. बालविवाह, बालविधवा, अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता, दारिद्र्य, कुपोषण, राजकीय व सामाजिक रूढी-परंपरांच्या विळख्यात ती अडकली होती. इस्लामी संस्कृती व परंपरेचा फार मोठा प्रभाव स्त्रियांवर होता. तरीही हैदराबाद मुक्ती लढ्यात महिलांनी मोलाचे योगदान दिले आहे.सन 1938 ते 1949 या  कालखंडात ज्या महिलांनी सहभाग नोंदवला त्यात आशाताई वाघमारे, सुशीलाताई दिवाण, पानकुंवर कोटेचा, सुलोचनाबाई बोधनकर, कावेरीबाई, गोदावरीबाई, लताबाई, उषा पांगुरीबाई, गिताबाई चारठाणकर ,प्रतिभाताई वैशंपायन, दगडाबाई शेळके, तारा परांजपे, करुणाबेन चौधरी, शकुंतला साले इत्यादी महिलांचा सहभाग होता. या महिलांच्या कार्याविषयी संशोधन देखील करता येईल असे त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.ए आर चव्हाण यांनी  भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघराज्यात विलीन करून घेतले.हैदराबाद राज्याच्या विलीनीकरणासाठी जनतेने जे सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले, हेच आंदोलन भारतीय इतिहासात 'हैदराबादचा स्वतंत्र -संग्राम ' या नावाने ओळखले जाते. हा स्वातंत्र -संग्राम भारतीय स्वातंत्र आंदोलनाचाच एक भाग होता असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी एस सातपुते व आभार डॉ. एम जी लांडगे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्त्तर कर्मचारी उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या