दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:सलग 9 दिवस,423 कि.मी.86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी

रविवार पासून सुनील गुट्टेंची परळी मतदार संघात शेतकरी संवाद यात्रा 

सलग 9 दिवस, 9 मुक्काम, 423 कि.मी.प्रवास व 86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी


परळी, प्रतिनिधी...

        परळी मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते सुनील गुट्टे हे परळी मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा करणार आहेत. रविवार दि.29 सप्टेंबर ते 9 आँक्टोंबर दरम्यान यक संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

         युवानेते सुनील गुट्टे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघातील डिग्रस येथून या शेतकरी संवाद यात्रेला रविवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी प्रारंभ होणार असुन 9 आँक्टोंबर रोजी परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे समारोप होणार आहे. ही यात्रा जवळपास पुर्ण परळी विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.

           सलग 9 दिवस,9 मुक्काम,86 गावे,423 कि.मी.अंतर कापत या शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधणार आहोत असे युवानेते सुनील गुट्टे यांनी सांगितले.या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्ना विषयी संवाद, पीक विमा,अनुदान,अदी शेती विषयी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन शासन दरबारी मांडुन ख-या अर्थाने जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी माय बाप जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या यात्रेची संकल्पना असल्याचे युवानेते सुनील गुट्टे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....