परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:सलग 9 दिवस,423 कि.मी.86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी

रविवार पासून सुनील गुट्टेंची परळी मतदार संघात शेतकरी संवाद यात्रा 

सलग 9 दिवस, 9 मुक्काम, 423 कि.मी.प्रवास व 86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी


परळी, प्रतिनिधी...

        परळी मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते सुनील गुट्टे हे परळी मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा करणार आहेत. रविवार दि.29 सप्टेंबर ते 9 आँक्टोंबर दरम्यान यक संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

         युवानेते सुनील गुट्टे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघातील डिग्रस येथून या शेतकरी संवाद यात्रेला रविवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी प्रारंभ होणार असुन 9 आँक्टोंबर रोजी परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे समारोप होणार आहे. ही यात्रा जवळपास पुर्ण परळी विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.

           सलग 9 दिवस,9 मुक्काम,86 गावे,423 कि.मी.अंतर कापत या शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधणार आहोत असे युवानेते सुनील गुट्टे यांनी सांगितले.या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्ना विषयी संवाद, पीक विमा,अनुदान,अदी शेती विषयी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन शासन दरबारी मांडुन ख-या अर्थाने जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी माय बाप जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या यात्रेची संकल्पना असल्याचे युवानेते सुनील गुट्टे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!