इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

कामगार अपघातात मृत झाल्यास 5 लाखांचे कवच, उपचारांसाठी देखील मिळणार निधी, पशूंनाही सानुग्रह अनुदानाचे कवच

 गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत अपघातासाठी सानुग्रह अनुदान योजनेचे कवच लागू


धनंजय मुंडेंची स्वप्नपूर्ती, शासन निर्णय निर्गमित


कामगार अपघातात मृत झाल्यास 5 लाखांचे कवच, उपचारांसाठी देखील मिळणार निधी, पशूंनाही सानुग्रह अनुदानाचे कवच


मुंबई (दि. 09) - सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी लावलेल्या रोपट्याला आता फळे येताना दिसत असून नुकत्याच राज्य शासनाने ऊसतोड कामगारांसाठी घोषित केलेल्या अपघात विमा कवचाला सानुग्रह अनुदान योजनेचे मूर्त स्वरूपात प्राप्त झाले असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 


स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून ऊस तोडणीच्या हंगामात कोणत्याही प्रकारच्या अपघातामध्ये ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याला पाच लाखांचे कवच या योजनेतून देण्यात येणार आहे, तर कायमचे अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. 


ऊसतोड कामगारांच्या झोपडी व साहित्याला 10 हजारांचे, वैयक्तिक अपघातात उपचारासाठी 50 हजार रुपयांचे, लहान बैलजोडी मृत झाल्यास 75 हजार रुपयांचे तर मोठी बैलजोडी मृत झाल्यास 1 लाख रुपयांचे कवच या सानुग्रह अनुदान योजनेतून लागू करण्यात आले आहे. 


अत्यंत कमीत कमी कागदपत्रे तसेच जिल्हा स्तरावर मंजुरीचे अधिकार दिल्याने खऱ्या अर्थाने ऊसतोड कामगारांना या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे. 


आजवर ऊसतोड कामगारांची कुठे कागदावर नोंद सुद्धा नसायची, मात्र सध्याचे कृषिमंत्री व तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप मिळाले. त्याला कायमस्वरूपी निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. महामंडळाच्या माध्यमातुन धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवानबाबा शासकीय वस्तीगृह योजनेतून तब्बल 82 वसतिगृहे सुरू करण्यात आली. ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली. त्यापाठोपाठ आता अत्यंत जोखमीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम तसेच कामगारांची बैलजोडी ते अगदी झोपडी व त्यातील साहित्याला अपघात व नैसर्गिक आपत्ती अपघाता मुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सानुग्रह अनुदान योजना लागू केल्याने, धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी पाहिलेले आणखी स्वप्न पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. 


राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम, बैलजोडी, झोपडी आदींना सानुग्रह अनुदान योजना लागू केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या