इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

शासन निर्णय निर्गमित; मुंडेंनी मानले उदय सामंत यांचे आभार

 धनंजय मुंडेंची मागणी मित्र उदय सामंतांनी केली पूर्ण


बीड जिल्हा उद्योग भवन उभारणीसाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान


शासन निर्णय निर्गमित; मुंडेंनी मानले उदय सामंत यांचे आभार


मुंबई (दि. 09) - केंद्र व राज्य शासनाच्या औद्योगिक विकासाच्या धोरणाला अनुसरून बीड जिल्ह्यामध्ये उद्योग उभारणी बाबतच्या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने जिल्ह्याचे अध्ययवत व सर्व सोयी युक्त असे उद्योग भवन असावे, याबाबतची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती, आपल्या मित्राची मागणी उदय सामंत यांनी मान्य केले असून बीड जिल्ह्यात सर्व सोयुक्त अध्यायावत उद्योग भवन उभारण्यासाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील उद्योजकांना एकाच ठिकाणी उद्योग उभारणी बाबतच्या सर्व सेवा मिळाव्यात या दृष्टीने हे उद्योग भवन अत्यंत उपयुक्त ठरणार असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीला अनुसरून सात जून रोजी झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी याबाबतचा प्रस्ताव मागवला होता. 


सदर उद्योग भवन हे सर्व सोयींनी युक्त तसेच संपूर्णपणे सौर उर्जेवर निर्भर असणार आहे, बांधकाम फर्निचर यासह विविध सुविधांसाठी एकूण 14 कोटी 69 लाख 28 हजार रुपये इतका निधी खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबद्दल धनंजय मुंडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....