इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

 मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

पुणे, प्रतिनिधी...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा उषा तांबे आणि कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधिंची महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तख्तावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना होती.बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावर्षी संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार- विचारवंत विनय हर्डीकर आदी नावे चर्चेत होती. यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते.हे संमेलन दि 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन दुपारी चारवाजता होणार आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका नामवंताची मुलाखत होणार आहे. या संमेलनात देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य, मराठी आणि महाराष्ट्र धर्म, लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन, मराठीचा अमराठी संसार, परिचर्चा "आनंदी गोपाळ' या पुस्तकावर, अनुवादावर परिसंवाद, मधुरव हा विशेष कार्यक्रम आदी विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच बहुभाषिक कविसंमेलन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असल्याचे प्रा. तांबे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....