दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

पाच हजार बक्षीस मिळवा-सौ.सुदामती गुट्टे

गोष्ट छोटी, डोंगरा एवढी: सुदामती गुट्टे यांनी परळीत महिलांसाठीच्या 'या' सुविधेवर जाहीर केलं इनाम !

परळी शहरात महिलांसाठी स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार बक्षीस मिळवा-सौ.सुदामतीताई गुट्टे

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     मतदार संघात केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कोणत्याच सोयी सुविधेकडे लक्ष दिलेले नाही. परळी शहराचा विचार केला तरी अगदी छोटी, क्षुल्लक मात्र अतिशय अत्यावश्यक असलेली सुविधाही नगरपरिषद देऊ शकलेली नाही. महिला वर्गाची प्रचंड कुचंबना यामुळे होते. परळी शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार रुपये बक्षीस मिळवा अशा प्रकारचे उपरोधिक इनामच रा.काॅ.शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांनी जाहीर केले आहे.

      याबाबत माहिती देताना रा.काॅ.शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांनी सांगितले की, परळी शहर हे प्रभु वैद्यनाथाची नगरी म्हणून ओळखली जाते. राज्य परराज्यातील मोठ्या प्रमाणात महिला भाविक भक्त येत असतात. शिवाय परळी तालुक्यातील महिला, नागरिक बाजार करण्यासाठी परळी शहरात येतात. तेव्हा त्यांना कुठेही शौचालय दिसून येत नाहीत. एखादे असलेले तेही प्रचंड घाण, दुर्गंधी असलेले आहे. या नैसर्गिक विधी साठी महिलांना प्रचंड मानसिक त्रास होतो. केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी एवढी साधी सुविधाही एवढ्या वर्षात उपलब्ध करून देता आली नाही.त्यामुळेच मी परळी शहरात महिलांसाठी स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार बक्षीस मिळवा अशी घोषणा केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....