इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

अन्यथा निवडणूकीत मतदान करायचे का नाही तो विचार करावा लागेल-भैयासाहेब आदोडे

 भिमवाडी बौध्द विहारासह नागरी समस्या त्वरित दुर करा


अन्यथा निवडणूकीत मतदान करायचे का नाही तो विचार करावा लागेल-भैयासाहेब आदोडे


परळी प्रतिनिधी गेली सात ते आठ वर्षांपासून भिमवाडी येथील धार्मिक विधी साठी असलेले बौद्ध विहार आधु-या कामामुळे अनुयायांना धार्मिक कार्यक्रम करता येत नाहीत या न.प.प्रशासनाच्या उधासीन धोरणामुळे भिमवाडी या वस्तीतील बोअर बंद,कुठे नाल्या नाही तर कुठे नाल्या भरलेल्या असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने केवळ मताचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी व न.प.प्रशासनाने या कडे त्वरित लक्षकेद्रित करुन कामे करावे अन्यथा होऊ घातलेल्या निवडणूकीत मतदान करावे की नाही अथवा बहिष्कार टाकावा लागेल असा खणखणीत इशाराच सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे सर यांनी यावेळी दिला आहे.


सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे सर यांनी पुढे बोलताना सांगितले कि,शहरातील एक महत्वाची असलेली भिमवाडी ही एक मोठी वस्ती म्हणून ओळख आहे.या वस्ती कडे केवळ मताचे राजकारण म्हणून न पाहता त्याठिकाणी नागरी सुविधा पण प्रशासनाने किंवा न.पवर सत्ता असलेल्या नेत्यांनी देणे गरजेचे असते याचे भान जाग्यावर आणण्यासाठी होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणूकीवर मतदान करायचे का नाही याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. याचे कारण ही तेवढे च आहे न.प.च्या उधासीन कारभारामुळे गेली कित्येक वर्षांपासून बौध्द विहाराचे  रखडुन आहे वेळोवेळी न.प.व.जिल्हा प्रशासनाला निवदनाद्वारे मागणी करुन ही दखल घेतली जात नाही दखल घेतली तरी थातुरमातुर काम करुन वेळमारुन घेतली जाते आज तागायत ते विहार अधुरेच आहे.शिवाय तीन बोअर बंद अवस्थेत आहेत.बौद्ध विहारासमोरील नालीचे कामही अधुरे आहे,पावसाळ्यात अनेक घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची घटना घडून गेली परंतु आज पर्यंत नुकसान भरपाई दिली गेली नाही यासह अनेक नागरी सुविधा चा अभाव असल्यामुळेच प्रशासनाने जाणीव पुर्वक भिमवाडी कडे लक्ष देणे सोडले कि काय असा प्रश्न उपस्थित करावा लागत आहे.जर प्रशासन किंवा मतावर डोळा ठेवणा-यावर यापुढे मतदान करायचे की नाही याचा विचार करावा लागेल असा भिमवाडीतील नागरिक विचार करत आहेत.या मागण्या त्वरित पुर्ण न केल्यास निवडणूकीत मतदान करायचे का नाही तो विचार करावा लागेल असा  इशारा च सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या