युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

 आता माघार घेऊ नका, राजेभाऊ तुम्ही लढाच!

परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या परळी मतदारसंघातील जनतेचा राजेभाऊ फड यांना आग्रह


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी विधानसभा मतदारसंघात विकास घडवून आणायचा असेल आणि मतदारसंघातील वातावरण निर्भय आणि सर्वधर्म समभावाचे बनवायचे असेल तर त्यासाठी परिवर्तन घडवावे लागेल. त्यासाठी युवक नेते राजेभाऊ फड हे सक्षम उमेदवार आहेत अशी जनसामान्यांच्या मनात भावना निर्माण झाल्याने मतदारसंघातून फड यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. निवडून येण्यास ते सक्षम उमेदवार असून त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह मतदरांतून केला जात आहे. त्यांनी कुठल्याही स्थितीत माघार न घेता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढवावी असा आग्रह परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या मतदार बांधवांतून केला जात आहे.


परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होईल असे चित्र निर्माण झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना तगडी लढत देऊ शकेल असा एकमेव उमेदवार राजेभाऊ फड आहेत अशी जनतेत भावना आहे. विकासाची सकारात्मक दृष्टी, उद्योग व्यापारातील त्यांचे संबंध यामुळे ते या मतदारसंघात रोजगार निर्मिती देऊ शकतात. अभ्यासू व्यक्तित्व असल्याने येथील वातावरण ते निर्भय बनवू शकतात त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाला नव्या नव्या संकल्पना मिळून इथला सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो असा जनतेतून विश्वास व्यक्त केला जात आहे. आजवर राजेभाऊ फड यांनी मदत मागण्यासाठी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. कुठलेही काम असेल तरी ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे नेहमीच सर्वांसाठी उपलब्ध असतात. म्हणून आम्हाला राजेभाऊ फड यांनाच आमदार करायचे आहे असा ठाम निश्चय जनतेतून व्यक्त केला जात आहे.


आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

राजेभाऊ फड यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. मागील काळातील सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परळी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राजेभाऊ फड यांनी निवडणूक लढवावी आणि कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नये असा आग्रह जनतेतून केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या