इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

 आता माघार घेऊ नका, राजेभाऊ तुम्ही लढाच!

परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या परळी मतदारसंघातील जनतेचा राजेभाऊ फड यांना आग्रह


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी विधानसभा मतदारसंघात विकास घडवून आणायचा असेल आणि मतदारसंघातील वातावरण निर्भय आणि सर्वधर्म समभावाचे बनवायचे असेल तर त्यासाठी परिवर्तन घडवावे लागेल. त्यासाठी युवक नेते राजेभाऊ फड हे सक्षम उमेदवार आहेत अशी जनसामान्यांच्या मनात भावना निर्माण झाल्याने मतदारसंघातून फड यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. निवडून येण्यास ते सक्षम उमेदवार असून त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह मतदरांतून केला जात आहे. त्यांनी कुठल्याही स्थितीत माघार न घेता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढवावी असा आग्रह परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या मतदार बांधवांतून केला जात आहे.


परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होईल असे चित्र निर्माण झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना तगडी लढत देऊ शकेल असा एकमेव उमेदवार राजेभाऊ फड आहेत अशी जनतेत भावना आहे. विकासाची सकारात्मक दृष्टी, उद्योग व्यापारातील त्यांचे संबंध यामुळे ते या मतदारसंघात रोजगार निर्मिती देऊ शकतात. अभ्यासू व्यक्तित्व असल्याने येथील वातावरण ते निर्भय बनवू शकतात त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाला नव्या नव्या संकल्पना मिळून इथला सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो असा जनतेतून विश्वास व्यक्त केला जात आहे. आजवर राजेभाऊ फड यांनी मदत मागण्यासाठी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. कुठलेही काम असेल तरी ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे नेहमीच सर्वांसाठी उपलब्ध असतात. म्हणून आम्हाला राजेभाऊ फड यांनाच आमदार करायचे आहे असा ठाम निश्चय जनतेतून व्यक्त केला जात आहे.


आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

राजेभाऊ फड यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. मागील काळातील सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परळी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राजेभाऊ फड यांनी निवडणूक लढवावी आणि कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नये असा आग्रह जनतेतून केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!