इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

पाणीपुरवठा आता होणार दोन दिवसाआड

 परळी शहराचा पाणीपुरवठा आता होणार दोन दिवसाआड; अश्विन मोगरकर यांच्या पाठपुराव्याला यश


परळी वैजनाथ

गणेशपार भागात मागील आठवड्यापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त शिष्टमंडळाने तक्रारींचा पाढा आक्रमकपणे मुख्याधिकार्यां समोर मांडल्यावर गावभागतील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याच्या सूचना विभागास दिल्या. तसेच अश्विन मोगरकर यांनी वारंवार केलेल्या मागणीनुसार पुढील आठवड्यापासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

गावभागतील गणेशपार विभागात मागील आठवड्यापासून पाणी न आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत होते. नवरात्र चालू आहे, दसरा दिवाळी तोंडावर आहे, तरीही नगरपरिषद प्रशासनाला नागरिकांच्या अडचणीही कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. 

याविरोधात  गावभागातील नागरिकांनी परळी नगरपरिषद मुख्याधिकार्यांना भेटून पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला. मुख्याधिकार्यांनी त्वरित पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. नागापूरच्या धरणात पाण्याची कमतरता असताना पाणी पाच दिवसाआड सोडले जात होते. आता धरण मागील एक महिन्यापासून ओसंडून वाहत आहे. तरीही शहराला पाच दिवसांआडच पाणी दिले जात आहे. त्यातही अनेक वेळा  छोट्या मोठ्या कारणाने व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एक दोन दिवस पाणी येत नाही. नगरपालिका नळपट्टी महिन्याभराची घेते पाणी मात्र महिन्यातून फक्त सहा वेळाच येत आहे. अश्विन मोगरकर यांनी अश्या सर्व तक्रारीचा पाढा मुख्याधिकार्यांसमोर वाचला. मुख्याधिकार्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या कडक सूचना संबधीत विभागास दिल्या. अश्विन मोगरकर यांनी पाणी सोडण्याचा कालावधी कमी करावा यासाठी सतत पाठपुरावा केला होता. यास प्रतिसाद देत पुढील आठवड्यापासून वेळापत्रकात बदल करून कालावधी कमी करण्याचे आश्वासन मुख्याधिकार्यांनी शिष्टमंडळास दिले आहे. यावेळी अश्विन मोगरकर, धनंजय आढाव, रमेश चौंडे, सचिन स्वामी, एत्तेश्याम खतीब सर व गावभागतील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....