इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

रेल्वेप्रश्नांवर जिव्हाळ्याच्या मागण्या....

 नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची डीआरएम यांच्याकडे मागणी-जी.एस.सौंदळे

  द्वादश पंचम ज्योतीर्लिंग श्री.वैद्यनाथ क्षेत्र परळी मार्गे पुणे- पनवेल जाणा-या नांदेड एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी व स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवून या रेल्वेने दाटीवाटीने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करून परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागिय व्यवस्थापक श्री.भरतेशकुमार जैन  परळी रेल्वे स्थानक येथे तपासणीनिमित्त बुधवार दि.9 अॉक्टोंबर रोजी आले असताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ बीड जिल्हा व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली.

   नांदेड-पनवेल रेल्वेगाडी च्या बोगी वाढवण्याच्या मागणीसह प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण मागण्या निवेदनात करण्यात आल्या यामध्ये

1)मछलीपट्टणम -बीदर, सिकंद्राबाद-बीदर इंटरसिटी,यशवंतपुर-बीदर एक्सप्रेस,पाटणा-पूर्णा,रायचूर-परभणी रेल्वे परळी-वैजनाथ पर्यंत त्वरीत विस्तारीत करावी.

2)दिवाळी सणानिमित्त परळी-वैजनाथ मार्गे सिकंदराबाद- छ.संभाजीनगर-मुंबई तसेच पुणे व ईतर ठिकाणी विशेष रेल्वे सुरू करावी.

3) 'पूर्णा-परळी' रेल्वे परत जाताना बहुअंशी रिकामीच असते त्या ऐवजी ती लातूर- धाराशिव किंवा उदगीर-बीदर पर्यंत विस्तारित करावी.

4)अमरावती -पुणे व कोल्हापुर नागपुर रेल्वे दररोज चालू कराव्यात 

5)क्राॅसिंगच्या निमित्ताने घाटनांदूर,वडगाव (निळा) इत्यादी स्टेशन वर विविध गाड्या विनाकारण अधिक वेळ खोळंबून ठेवू नयेत,परळी रेल्वे स्थानकातील आरक्षण वेळ वाढवावी यासह ईतर मागण्या करण्यात आल्या यावेळी नगरसेवक चेतन सौंदळे,प्रवासी महासंघ बीड जिल्हा संघटक सुधीर  फुलारी सर,विजयाताई दहीवाळ,सत्यनारायण दुबे,माजी नगरसेवक सोमनाथ निलंगे,मकरंद नरवणे,कैलास तांदळे,राजेश कांकरिया, दै.लोकमत चे तालुका प्रतिनिधी पत्रकार संजय खाकरे,रमणीक पटेल,चंदूअण्णा हालगे,शिरीष सलगरे,हिरालाल बोरा,अनिल मिसाळ,आदिंची उपस्थिती होती.परळी मार्गे विविध ठिकाणी रेल्वे सुरू करणे तसेच पिट लाईन यंत्रणा व रेल्वे स्थानकात अद्यावत सुविधा निर्माण करण्याचे काम रेल्वे विभागामार्फत करण्याचे सकारात्मक आश्वासन शिष्टमंडळास डीआरएम श्री.जैन यांनी  दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....