इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी!

 पालकमंत्री धनंजय मुंडेंचे बीड जिल्हा वासीयांना मोठे गिफ्ट 


यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बीड जिल्ह्यात तब्बल 28 हजार घरकुलांना शासनाची मंजुरी


जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी!


मुंबई (दि. 09) -

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. 


याबाबतचे शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे 17081 तर दुसऱ्या शासन निर्णयाद्वारे 9941 अशा एकूण 28 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री श्री अतुल सावे यांचे याबद्दल आभार मानले आहेत. 


विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील गरजू नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतुन स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये निधी दिला जातो. 


बीड जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्याबाबत जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन प्राप्त प्रस्तावांची यादी राज्य शासनास सादर केली, त्यानुसार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून तब्बल 28 हजार घरकुलांना एकाच वेळी मंजुरी देण्यात आली आहे. 


बीड जिल्ह्यात तालुकानिहाय आकडेवारी पाहता, घरकुलांसाठी एकत्रित पणे इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करण्यात आले आहेत, धनंजय मुंडे यांच्या आग्रही भूमिकेमुळे हे होऊ शकले, असे बोलले जात आहे.


जिल्ह्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने एका योजनेतून घरकुलांना मंजुरी मिळण्याची ही पहिलीच वेळ असून, यामध्ये सर्व तालुक्यांना न्याय देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....