इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

धक्कादायक दावा : पुनम महाजन नेमकं काय म्हणाल्या ?

प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठे षडयंत्र : पूनम महाजन यांचा धक्कादायक दावा

     भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत त्यांच्या कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होत्या. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रमोद महाजनांची हत्या हे एक मोठे षड्यं होते. याबाबतचे सत्य कधीतरी बाहेर येईलच, असे विधान पूनम महाजन यांनी केले आहे.

पूनम महाजन काय म्हणाल्या ?

  पूनम महाजन म्हणाल्या की, प्रमोद महाजन यांच्यावर झाडलेली गोळी फक्त एका माणसाच्या रागाची, मत्सराची नव्हती. राग आणि मत्सर होता. कारण त्या गोळीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. त्या बंदुकीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. पैसे इतके होते की, तुम्ही कोर्ट केसही लढू शकला होता. तुम्ही आयुष्यही घालवू शकला होता. पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती. मी नेहमी म्हणते की त्यामागे मोठे षड्यंत्र होते. आज, उद्या किंवा परवा कधीतरी कळेल, हे षड्यंत्र काय होते. त्यामधून कळेल हे का झाले. दोन भावांमध्ये भांडण काहीच नव्हते. जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो, त्यात भांडण काहीच नसते. मला परत या गोष्टीवर जास्त बोला नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगते, याच्यामागे फार मोठं षडयंत्र आहे.

प्रमोद महाजन यांच्या हत्येदिवशी नेमके काय घडलं ?

२२ एप्रिल २००६ रोजी मुंबईतील वरळी येथे सकाळी सात वाजता प्रमोद महाजन यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ए दिवस आधी प्रवीण यांनी प्रमोद महाजन यांना मेसेज करून अब न होगी याचना, न प्रार्थना,अब रण होगा, जीवन या मरण होगा, असे लिहिले होते.

     पांढऱ्या कुर्ता आणि पायजमात असलेले प्रमोद महाजन सकाळी ७ वाजता सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यावेळी प्रवीण हे त्यांच्या घरी गेले. प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनी दरवाजा उघडल्यानंत आत आले. प्रवीण हे भावासमोर सोफ्याच्या बसले. रेखा महाजन चहा करण्यासाठी आतगेल्या. त्यानंतर दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर भेटीची वेळी घेऊन मगच भेटायला या, असे प्रमोद महाजन म्हणताच प्रवीण यांनी त्यांच्याजवळील रिव्हॉल्वरमधून तीन गोळ्या झाडल्या, आणि ते तेथून निघून गेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या